Maharashtra Politics | शिवसेनेच्या या आक्रमक पवित्र्यानंतर शिंदे गटही सक्रिय झाले आहेत. शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के आणि प्रवक्ते किरण पावसकर यांनी तातडीने प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपली बाजू स्पष्ट केली आहे. सत्ता गेल्यामुळे शिवसेना बिथरली आहे. त्यामुळे शिवसेनेकडून आमदार सदा सरवणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला.

हायलाइट्स:
- सदा सरवणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर शिवसैनिक आणखीनच आक्रमक
- समाधान सरवणकर यांचे बॅनर्स फाडायला सुरुवात
प्रभादेवी आणि दादर परिसरात शिवसैनिक आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यानंतर पोलिसांनी २५ शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले होते, तर महेश सावंत यांच्यासह पाच शिवसैनिकांना अटक केली होती. यानंतर शिवसेनेचे मुंबईतील बडे नेते सक्रिय झाले होते. हे सर्वजण रविवारी सकाळपासून दादर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून बसले होते. यावेळी अरविंद सावंत यांनी सदा सरवणकर यांच्यावर चांगलीच आगपाखड केली. सदा सरवणकर यांनी आपल्या पिस्तुलातून राडा झाला त्याठिकाणी आणि पोलीस स्टेशनच्या परिसरात अशा दोन ठिकाणी फायरिंग केले. आमचे शिवसैनिक याची तक्रार दाखल करायला गेले तेव्हा पोलिसांनी त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले, असा आरोप अरविंद सावंत यांनी केले.
शिवसैनिक आक्रमक,समाधान सरवणकरांचे बॅनर्स फाडले
दादर पोलिसांनी सदा सरवणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर शिवसैनिक आणखीनच आक्रमक झाले. त्यांनी सदा सरवणकर यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. तसेच शिवसैनिकांच्या एका गटाने दादर परिसरातील समाधान सरवणकर यांचे बॅनर्स फाडायला सुरुवात केली आहे. याशिवाय, समाधान सरवणकर यांच्या बॅनर्सवर काही ठिकाणी दगडफेकही करण्यात आली. त्यामुळे दादरमधलं वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.
‘शिवसैनिकांनी माझ्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चेन चोरली’
शिंदे गटाचे कार्यकर्ते संतोष तेलवणे आणि शिवसैनिकांमध्ये शनिवारी मध्यरात्री पुन्हा वाद झाला होता. शिवसैनिक आपल्याला मारहाण करण्यासाठी आले होते, असे संतोष तेलवणे यांनी म्हटले. त्यावेळी शिवसैनिकांनी माझी दोन तोळ्याची चेन चोरली, अशी तक्रार तेलवणे यांनी दादर पोलिसांकडे दाखल केली आहे. शनिवारी मध्यरात्री मी माझ्या बिल्डिंगखाली उभा होतो तेव्हा उद्धव ठाकरे गटाचे ५० जण आले. तेव्हा मी एकटाच होतो. आले आणि म्हणाले बोल आता काय बोलतो?” पण मीसुद्धा या ५० जणांना पुरुन उरलो. मी त्यांना म्हणालो तुम्हाला हात लावायचा असेल हात लावा मला ठार मारा. जिवंत ठेवलात तर तुम्हा प्रत्येकाला घरातून उचलून नेईन, असे मी शिवसैनिकांना म्हटले. यावेळी तेलवणे यांनी सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोपही फेटाळून लावला. गोळीबार वाघावर करतात, शेळ्यांवर नव्हे, अशा शब्दांत तेलवणे यांनी शिवसैनिकांना डिवचले होते.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.