विठ्ठल मंदिर आणि सरकारचा हस्तक्षेप
विठ्ठल मंदिर समितीची वार्षिक उलाढाल ३५ कोटींच्या आसपास असून विठुरायाच्या दर्शनाला वर्षभरात दीड कोटी भाविक येत असल्याने हे देवस्थान ताब्यात घेण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ लागते. पंढरपूर हे वारकरी संप्रदायाचे मोठे तीर्थक्षेत्र आहे. वर्षभरातील प्रमुख वाऱ्या या ठिकाणी बहरतात. त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला महत्त्व आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना या ठिकाणच्या अध्यक्षपदाला राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे राजकीय व्यक्तींचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीनेही या अध्यक्षपदाकडे पाहिले जाते.
या पार्श्वभूमीवर डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी न्यायालयात केलेल्या याचिकेला महत्व आलं असून याप्रकरणी आगामी काळात कोर्टाकडून काय निर्देश दिले जातात, हे पाहावं लागेल.