परभणी : जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शिवारामध्ये भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. भरधाव स्कार्पिओवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी कालव्यामध्ये पडून दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी दैठणा पोलिसांमध्ये स्कार्पिओ चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयश्री सचिन बचाटे अशोक अर्जुन बचाटे असे अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

एम.एच २२. ५५११ क्रमांकाच्या स्कार्पिओमधून बीड येथील बचांगे कुटुंब नांदेडवरून बीडकडे परत जात होते. गाडी परभणीच्या ब्रह्मपुरी शिवारात आली असता गाडीचे चालक राहुल पंडीत पवार (रा. कुमरेवाडी तांडा ता. धारुर जि. बीड) यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी कालव्यामध्ये जाऊन पडली. या अपघातामध्ये जयश्री सचिन बचाटे, अशोक अर्जुन बचाटे या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर भास्कर रामभाऊ बचाटे, सचिन भास्कर बचाटे, दादासाहेब सदाशिव बचाटे, दिनेश बालासाहेब बचाटे हे चौघे जखमी झाले.

राष्ट्रवादीच्या माजी खासदाराचे गडकरींना जेवणाचे निमंत्रण, मात्र एकच अट…
यावेळी स्कार्पिओ गाडीचा चालक राहुल पंडित याने जखमींची मदत करण्याऐवजी घटनास्थळावरून पळून गेला. घटनेची माहिती मिळतात सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी, बीट जमादार बळीराम मुंढे, पडोळे, वीरकर यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल केले. याप्रकरणी दैठणा पोलीस ठाण्यामध्ये दिनेश बचाटे यांच्या फिर्यादीवरुन निष्काळजीपणे गाडी चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकणी चालक राहुल पंडीत पवार याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुर्यवंशी करत आहेत.

महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसाचा कहर, दुसऱ्या राज्यात जाणारी वाहतूक ठप्प

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here