Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Sep 12, 2022, 3:33 PM

Navi Mumbai : शाळकरी मुलांना घेऊन जात असताना एका स्कूल बसला आग लागल्याची बातमी समोर आली आहे. खारघरमध्ये ही घटना घडली आहे. विद्यार्थ्यांना वेळीच बसमधून उतरवल्याने सुदैवाने ही दुर्घटना टळली आहे.

 

Navi Mumbai
Navi Mumbai : विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या स्कुल बसला आग, दैव बलवत्तर म्हणून…

हायलाइट्स:

  • शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल बसला आग
  • विद्यार्थ्यांना वेळीच उतरवल्याने सुदैवाने दुर्घटना टळली
  • अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं
नवी मुंबई: शाळकरी मुलांना घेऊन जात असताना एका स्कूल बसला आग लागल्याची घटना समोर आली आहे. खारघरमधील सेक्टर १५ मधील घरकुल सोसायटीजवळ ही घटना घडली आहे. या घटनेत स्कूल बस जळून खाक झाली आहे. मात्र, विद्यार्थ्यांना वेळीच उतरवल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील खारघर येथील पीपल एज्युकेशन संस्थेच्या स्कूल बस विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जात होती. खारघर सेक्टर १५ येथील घरकुल सोसायटीजवळ ही स्कूल बस आली असता अचानक या बसमधून धुराचे लोट येऊ लागले. बस चालकाने प्रसंगावधान साधत बसमधील सर्व विद्यार्थ्यांना सुखरुप बाहेर काढलं.

महाराष्ट्रात राहायचंय-फिरायचंय ना? सरवणकरांच्या भेटीनंतर राणेंचा ठाकरेंना उघड इशारा
त्यानंतर खारघर अग्निशमन दलाला घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवत आग विझवली. मात्र, अचानक लागलेल्या या आगीत स्कूल बसचे मोठे नुकसान झाले असून बस चालकाच्या प्रसंगाधानाने कुठलीही जीवीतहानी झालेली नाही.

एक चूक पडली महागात, श्वेता तिवारीचा उडालाय लग्नसंस्थेवरचा विश्वास, काय म्हणते अभिनेत्री पाहा

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here