Maharashtra Politics | औरंगाबादच्या पैठणमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा. या सभेला भाजपचे नेते रावसाहेब दानवे आणि भागवतराव कराड हेदेखील उपस्थित आहेत. या सभेपूर्वी काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी व्यासपीठाजवळ जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांना या कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीमार करावा लागला. या सभेत शहाजीबापू पाटील यांनी जोरदार फटकेबाजी केली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

हायलाइट्स:
- मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंगच फुंकले
- मराठी माणसाच्या दुरावस्थेसाठी उद्धव ठाकरे जबाबदार
- तुमची सत्ता असताना मुंबईतून मराठी माणूस का बाहेर फेकला गेला?
यावेळी एकनाथ शिंदे यांनी मराठी माणसाचा मुद्दा उपस्थित करत एकप्रकारे मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंगच फुंकले. यावेळी शिंदे यांनी मुंबईतील मराठी माणसाच्या दुरावस्थेसाठी उद्धव ठाकरे आणि शिवसेनाच कशी जबाबदार आहे, पटवून देण्याचा प्रयत्न केला. शिवसेना केवळ निवडणूक आली की मराठीचा मुद्दा पुढे आणते. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायचा डाव असल्याचे सांगितले जाते. पण हे सगळं फक्त निवडणुकीपुरतंच बोललं जातं. निवडणूक संपली की मराठी माणूस देशोधडील का लागला, मुंबईतील मराठी टक्का कमी का झाला, याकडे कोणीही लक्ष देत नाही. आता तुम्ही ज्याप्रकारे मुलुंड, भांडूप, दादर आणि परळ भागातील घराघरांमध्ये जात आहात, तसे पूर्वी गेले असतात तर मुंबईतील मराठी टक्का कमी झाला नसता. मात्र, आधी मराठी माणसांचा वापर करायचा आणि नंतर खापर दुसऱ्यांवर फोडायचे, ही तुमची रणनीती आमच्या लक्षात आली आहे, असे सांगत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर थेट प्रहार केला.
दैनिक ‘सामना’तून एकनाथ शिंदेंची सेना लाचार आहे, असं म्हटलं जातं. एकनाथ शिंदे हे हा केवळ बुडबडा आणणारा साबण आहे, असे म्हटले जाते. पण याच साबणाने तुमची धुलाई केली आहे, हे लक्षात असू द्या, असा टोला एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला हाणला. त्यामुळे आता शिवसेना या सगळ्याचा आता कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.