Maharashtra Politics | औरंगाबादच्या पैठणमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा. या सभेला भाजपचे नेते रावसाहेब दानवे आणि भागवतराव कराड हेदेखील उपस्थित आहेत. या सभेपूर्वी काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी व्यासपीठाजवळ जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांना या कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीमार करावा लागला. या सभेत शहाजीबापू पाटील यांनी जोरदार फटकेबाजी केली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

 

Uddhav Thackeray Eknath Shinde Sakar
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे

हायलाइट्स:

  • मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंगच फुंकले
  • मराठी माणसाच्या दुरावस्थेसाठी उद्धव ठाकरे जबाबदार
  • तुमची सत्ता असताना मुंबईतून मराठी माणूस का बाहेर फेकला गेला?
मुंबई: शिवसेनेला मराठी माणसाला एवढाच पुळका होता, तर गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईतील मराठी माणूस बाहेर का फेकला गेला, या प्रश्नाचे उत्तर द्या. हिंमत असेल असेल तर दैनिक ‘सामना’तून आजघडीला मुंबईत किती मराठी माणसं उरलेत, याची आकडेवारी जाहीर करा, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आव्हान दिले आहे. सामनातील ‘रोखठोक’ सदरातून आमच्यावर सतत टीका केली जाते. पण त्याच सदरातून मुंबईतील मराठी माणसाच्या सद्यपरिस्थितीवर भाष्य केले जावे. तुमची सत्ता असताना मुंबईतून मराठी माणूस का बाहेर फेकला गेला? मराठी माणसाला वांगणी, बदलापूर, विरारला का जावे लागले, याचे विश्लेषण करा, असा सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. ते सोमवारी पैठणमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते.
‘शिंदे साहेबांसाठी हार-पुष्पगुच्छ घ्यायला गेलो पण सगळं संपलं होतं’, शहाजीबापूंनी सांगितला ‘तो’ किस्सा
यावेळी एकनाथ शिंदे यांनी मराठी माणसाचा मुद्दा उपस्थित करत एकप्रकारे मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंगच फुंकले. यावेळी शिंदे यांनी मुंबईतील मराठी माणसाच्या दुरावस्थेसाठी उद्धव ठाकरे आणि शिवसेनाच कशी जबाबदार आहे, पटवून देण्याचा प्रयत्न केला. शिवसेना केवळ निवडणूक आली की मराठीचा मुद्दा पुढे आणते. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायचा डाव असल्याचे सांगितले जाते. पण हे सगळं फक्त निवडणुकीपुरतंच बोललं जातं. निवडणूक संपली की मराठी माणूस देशोधडील का लागला, मुंबईतील मराठी टक्का कमी का झाला, याकडे कोणीही लक्ष देत नाही. आता तुम्ही ज्याप्रकारे मुलुंड, भांडूप, दादर आणि परळ भागातील घराघरांमध्ये जात आहात, तसे पूर्वी गेले असतात तर मुंबईतील मराठी टक्का कमी झाला नसता. मात्र, आधी मराठी माणसांचा वापर करायचा आणि नंतर खापर दुसऱ्यांवर फोडायचे, ही तुमची रणनीती आमच्या लक्षात आली आहे, असे सांगत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर थेट प्रहार केला.
मुख्यमंत्र्यांच्या सभेला अंगणवाडी सेविकांना हजर राहण्याचे आदेश, अजित पवार संतापले
दैनिक ‘सामना’तून एकनाथ शिंदेंची सेना लाचार आहे, असं म्हटलं जातं. एकनाथ शिंदे हे हा केवळ बुडबडा आणणारा साबण आहे, असे म्हटले जाते. पण याच साबणाने तुमची धुलाई केली आहे, हे लक्षात असू द्या, असा टोला एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला हाणला. त्यामुळे आता शिवसेना या सगळ्याचा आता कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here