म. टा. वृत्तसेवा, ठाणेः ठाणे जिल्ह्यातील सहा जनावरांना लंपी आजाराची लागण झाली असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली आहे. त्यात शहापूर तालुक्यातील तीन, अंबरनाथ तालुक्यातील एक आणि भिवंडी तालुक्यातील दोन जनावरांचा समावेश आहे. जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून या प्राण्यांवर उपचार सुरू करण्यात आले असून, लागण झालेल्या प्राण्यांच्या ठिकाणापासून पाच किमीच्या परिघातील प्राण्यांचे लसीकरण करण्याचे काम पशुसंवर्धन विभागाने सुरू केले आहे.

या जनावरांना काही दिवसांपूर्वी ताप येणे, चारा खाण्याचे प्रमाण कमी होणे तसेच अंगावर ठिकठिकाणी गाठी येणे यांसारखी लक्षणे दिसून आली होती. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील चिनावल या गावामध्ये जनावरांना लंपीसदृश्य रोगाची लागण झाल्याची बाब समोर आली होती. त्यानंतर पुणे, धुळे, लातूर, औरंगाबाद, बीड, सातारा, बुलडाणा आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये जनावरांना आजाराची लागण झाल्याचे समोर आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here