अमरावती : अमरावती जिल्ह्यातून पावसाने अद्याप एक्झिट घेतलेली नाही. आकाशात ढगांच्या दाटीमुळे सायंकाळी अंधारून आले होते. ढगांची दाटी संपूर्ण जिल्हाभर कायम असल्याचा फटका आता तूर, सोयाबीन, कपाशी केळी आणि संत्रा या पिकांना बसत आहे. सततच्या पावसाने कपाशीचे बोंड सडू लागले असून एकीकडे १४ हजार भाव असताना शेतकऱ्यांना हे नुकसान पचवणे कठीण जात आहे.

जिल्ह्यातील परतवाडा चांदुर बाजार, चांदुर रेल्वे दिवसा, अचलपूर, अंजनगाव, वरुड, मोर्शी या तालुक्यात मोठ्या प्रमाणात संत्रा उत्पादक शेतकरी आहेत. जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या सतत धार पावसामुळे शेतकऱ्यांपुढे नवे संकट निर्माण झाले आहे.

अमरावती- बडनेरा शहरात दुपारी १२ पासून पाऊस टप्याटप्प्याने आला. चांदूर रेल्वे येथे जोरदार पावसाने आठवडी बाजाराचे नुकसान झाले. भातकुली तालुक्यात टाकरखेडा शंभू अचलपूर, पुरातही मुसळधार पाऊस कोसळला. चांदूर बाजारात मुसळधार पावसाची नोंद झाली. दर्यापूर, येवदा व परिसरात विजेच्या कडकडाटासह पावसाने बॅटिंग केली. शिरजगाव कसबा येथील गणेश विसर्जन सोहळ्यात पावसाचा मारा सहन करावा लागला. त्यामुळे दुपार पासूनच अंधाराचे सावट होते. अंजनगाव सुर्जी येथे दिवसभरापासून पाऊस भन्नाट कोसळत होता. ढगांच्या दाटीने दुपारी ४ वाजताच अंधार पसरला. तथापि, या पावसामुळे कुठेही नुकसान झाल्याची नोंद नाही.

काळजी घ्या! ठाणे जिल्ह्यातही लंपीचा शिरकाव; काय आहेत लक्षणे
ढगफुटीसदृश पावसामुळे तीन गावामध्ये शिरले पाणी

धामणगाव रेल्वे तालुक्याला रविवारी सहाव्यांदा अतिवृष्टीने झोडपले. आठ गावांमध्ये ९० मिमीपेक्षा अधिक ढगफुटीसदृश पाऊस कोसळला. ११ घरांची पडझड झाली तर तीन गावांमध्ये पावसाचे पाणी शिरले. यात विरुळ रांधे, वाघोली, गुंजीचा समावेश आहे. विदर्भ, मोती कोळसा, वर्धा नद्या फुगल्याने तालुक्यातील अनेक मार्गावर वाहतूक बंद झाली होती.

करुणा मुंडेंच्या नव्या घोषणेनं राजकारण तापणार; पंकजा मुंडेंशीही संघर्ष होणार?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here