Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by रोहित धामणस्कर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Sep 13, 2022, 5:29 PM

Love relationship Tragic end | उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ येथील राहणाऱ्या या प्रेमी युगुलाने टोकाचे पाऊल उचलले आहे. गणेश विद्यालयात मागील वर्षीच इयत्ता १२ वी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या प्रांजली भारत सुतार व विवाहित असलेल्या वाजिद चाँद इनामदार यांनी राहत्या घरात एका दोरीने गळफास घेतला. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.

 

Couple Suicide
प्रेमीजीवांनी आयुष्यच संपवलं

हायलाइट्स:

  • सध्याच्या काळात लव्ह जिहादवरुन रान पेटले आहे
  • धर्माच्या भीतीने त्या दोन प्रेमी जीवांनी आयुष्य संपवलं
सोलापूर: आमचं प्रेम समाजाला मान्य नाही, अशी चिठ्ठी लिहून प्रेमीयुगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ या गावात सोमवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर बीबी दारफळ परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. राज्यात एकीकडे लव्ह जिहाद विविध प्रकरणाने वातावरण ढवळून निघत असतानाच सोलापुरात हिंदू मुलगी आणि मुस्लिम पुरुषाने प्रेमप्रकरणात अपयशी ठरल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.याबाबतची नोंद तालुका पोलीस ठाणे येथे झाली आहे.
‘बायकोला सोड आणि माझ्याशी लग्न कर’; प्रेयसीच्या तगाद्याला कंटाळून विवाहित तरुणाचं टोकाचं पाऊल
उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ येथील राहणाऱ्या या प्रेमी युगुलाने टोकाचे पाऊल उचलले आहे. गणेश विद्यालयात मागील वर्षीच इयत्ता १२ वी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या प्रांजली भारत सुतार व विवाहित असलेल्या वाजिद चाँद इनामदार यांनी राहत्या घरात एका दोरीने गळफास घेतला.ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.दोघांचे शव सोलापुरातील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनसाठी दाखल करण्यात आले आहे.

कोकणातील एकतर्फी लव्हस्टोरीचा ट्रॅजिक एन्ड, ‘क्रश’ला भेटण्यासाठी बुरखा घालून बाजारपेठेत आला अन्..
पोलिसांना मृतांकडे दोन चिठ्ठ्या आढळल्या

बीबी दारफळ येथे गळफास घेतल्याची माहिती मंगळवारी सकाळी ७ वाजता सोलापूर तालुका पोलीस ठाण्याला मिळाली.पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेह खाली उतरविले त्यानंतर शवविच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले.पोलिसांनी कसून तपास केला असता या प्रेमी युगुलाने आत्महत्या करण्यापूर्वी स्वतंत्र दोन चिठ्ठ्या लिहिल्या होत्या.त्या चिठ्ठ्या पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. ‘आमचं प्रेम समाजाला मान्य नाही… आमच्या आत्महत्येला कोणासही जबाबदार धरू नये’, असा मजकूर चिठ्ठीत लिहिल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत अधिक तपास तालुका पोलीस करत आहेत.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here