नाशिक : मनमाड शहरातील ठाकरे गटाच्या शिवसेनेला मोठे खिंडार पडले असून शिवसेना शहर प्रमुख मयूर बोरसे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देऊन ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला आहे. बोरसे यांनी राजीनामा दिल्यामुळे कार्यकर्त्यामध्ये खळबळ उडाली आहे. त्यांनी पदाचा राजीनामा का दिला याबाबत वेगवेगळ्या चर्चेला उधान आले असून आगामी काळात बोरसे आणि त्यांचे कार्यकर्ते काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत तब्बल ४० आमदार आणि काही खासदार यांनी उठाव केल्यानंतर त्याचे पडसाद मोठ्या शहरापासून गावपातळीपर्यंत देखील उमटू लागले आहेत. अनेक ठिकाणी पदाधिकारी, कार्यकर्ते ठाकरे गटाला सोडून शिंदे गटात शामिल होत आहे. मनमाड शहरासोबत नांदगाव तालुक्यातील शिवसेना कार्यकर्ते दोन गटात विभागले गेले असून शिवसेना एक संघ असताना मयूर बोरसे हे गेल्या अनेक वर्षा पासून शहर प्रमुख पदाची जबाबदारी पार पाडत होते.

जुहूतील भूखंडाची किंमत गगनात, मुंबईत ३३२ कोटींचा विक्री व्यवहार
मयूर बोरसे यांच्यासोबत मोठ्या संख्येने कार्यकर्ते असून जनतेसाठी त्यांनी वेळोवेळी आंदोलने देखील केली आहेत. त्यांनी पदाचा राजीनामा दिल्यामुळे एकच खळबळ उडाली असून आगामी काळात बोरसे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले असून बोरसे यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

भाजप गुजरातचे हित जपण्यात व्यस्त, बडा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानंतर जयंत पाटील संतापले, लागोपाठ ३ ट्विट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here