Maharashtra Project Gujarat | फॉक्सकॉन वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्रातील वातावरण तापलं. मोठी आर्थिक गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीची क्षमता असलेला हा प्रकल्प शेवटच्या क्षणी गुजरातमध्ये गेला आहे. सत्ता येते आणि जाते, राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असायला हवे. पण एवढी मोठी गुंतवणूक महाराष्ट्राच्या हातातून जाता कामा नये, असे अजित पवार यांनी म्हटले.

 

Ajit Pawar Eknath Shinde (3)
अजित पवार आणि एकनाथ शिंदे

हायलाइट्स:

  • या प्रकल्पासाठी वेदांता कंपनीने चार राज्यांशी चर्चा केली होती
  • जमिनीच्या १०० निकषांचा विचार करता तळेगावची जागा योग्य होती
  • राजकीय दबावापोटी हा प्रकल्प गुजरातमध्ये नेण्यात आला
औरंगाबाद: वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पातून राज्यात मोठी गुंतवणूक होण्याबरोबरच महाराष्ट्राला प्रचंड वस्तू व सेवा कर (GST) मिळणार होता. सध्याच्या काळात अनेक तरुणांच्या हाताला काम नाही. अशावेळी तब्बल दोन लाख रोजगार उपलब्ध करून देणारा हा प्रकल्प महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटून यासंदर्भात तातडीने पावले उचलण्याची विनंती केल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले. आम्ही सगळी परिस्थिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आणून दिली. हा प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी वेळ पडल्यास दिल्लीत जा. इथे राजकीय इच्छाशक्ती दाखवणे गरजेचे आहे. तुम्ही काहीही करा, यासंदर्भात वेदांता समूहाशी बोलून त्यांच्याकडे महाराष्ट्रात परत येण्यासाठी आग्रह धरा, अशी विनंती आपण मुख्यमंत्र्यांना केल्याचे अजित पवार यांनी सांगितले. ते बुधवारी औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
Vedanta Foxconn प्रकल्प महाराष्ट्रातून का गेला? पंतप्रधान मोदींनी एकनाथ शिंदेंना सांगितलं नेमकं कारण
यावेळी अजित पवार यांनी पुन्हा एकदा Vedanta Foxconn हा प्रकल्प राजकीय दबावापोटी महाराष्ट्रातून गुजरातच्या धोलेरा येथे हलवण्यात आल्याचे सांगितले. तळेगावच्या तुलनेत धोलेरा येथे काहीच सुविधा नाहीत. सत्ता येते आणि जाते, राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असायला हवे. पण एवढी मोठी गुंतवणूक महाराष्ट्राच्या हातातून जाता कामा नये, असे अजित पवार यांनी म्हटले.
प्रकल्प गुजरातला गेल्याने राजकीय वादळ, फडणवीसांनी थेट रशियावरुन फोन करुन दिली महत्त्वाची सूचना
कोरोनानंतरच्या काळात चीनमधून अनेक प्रकल्प इतर देशांमध्ये जात होते. त्याचा फायदा भारताला मिळावा यासाठी तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई, आदित्य ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मी स्वत: प्रयत्न करत होतो. त्यावेळी सेमीकंडक्टकर चीपचा तुटवडा असल्याने वाहननिर्मिती उद्योगात अडथळे निर्माण झाली होती. या चीप तयार करणारी फॉक्सकॉन कंपनी चीनमधील आपला कारखाना दुसरीकडे हलवायचा विचार करत होती. हा एकूण दीड लाख कोटींचा प्रकल्प होता. तर या प्रकल्पामुळे लघूउद्योगांमध्ये ५० हजार कोटींची गुंतवणूक होणार होती. त्यामुळे या गुंतवणुकीचा एकूण आकडा दोन लाख कोटीचा होता. या प्रकल्पासाठी वेदांता कंपनीने चार राज्यांशी चर्चा केली होती. यामध्ये त्यांना लागणाऱ्या जमिनीच्या १०० निकषांचा विचार करता तळेगावमध्ये टप्पा क्रमांक चारमधील जागा अंतिम करण्यात आली होती. वेदांता समूहाकडून ६० टक्के आणि फॉक्सकॉन ४० टक्के अशा जॉईंट व्हेंचरमध्ये ही गुंतवणूक होणार होती. तळेगावच्या जागेत या प्रकल्पासाठी आवश्यक असणारी इकोसिस्टम, कनेक्टिव्हिटी, मनुष्यबळ आणि राज्याचे पोषक औद्योगिक धोरण अशा सर्व गोष्टी अनुकूल होत्या. त्यामुले वेदांता कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी करून प्रकल्पासाठी तळेगावची निवड केली होती. मात्र, त्यानंतर राजकीय दबावापोटी हा प्रकल्प गुजरातमध्ये नेण्यात आला, असा आरोप अजित पवार यांनी केला.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here