Dead Body Of Ranjila Valvi : रंजिला वळवी यांच्या मृत्यूनंतर एकदोन नव्हे, तर तब्बल ४४ दिवस उलटून देखील एका बापाने आपल्या मुलीला न्याय मिळावा यासाठी तिचा अंत्यसंस्कार न करता तिचा मृतदेह मीठाच्या खड्ड्यात पुरुन ठेवला होता. मुलीवर बलात्कार होऊनही तिचा खून झाला असतांना पोलिसांनी फक्त आत्महत्येचा गुन्हा नोदवुन घेतला. इतकेच नव्हे तर, शवविच्छेदन अहवालात देखील तिच्यावर अत्याचारांबाबत काही तपासणीच करण्यात आली नाही. असा आरोप करत पीडित बापाने ग्रामस्थांच्या मदतीने व्यवस्थेविरोधातच लढा सुरू केला होता.

हायलाइट्स:
- तब्बल ४५ दिवसांनंतर बाहेर काढला रंजिला वळवीचा मृतदेह.
- मिठाच्या खड्ड्यात जतन करून ठेवला होता मृतदेह.
- मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतील जेजे रुग्णालयात पाठवण्यात आला.
रंजिला वळवी यांच्या मृत्यूनंतर एकदोन नव्हे, तर तब्बल ४४ दिवस उलटून देखील एका बापाने आपल्या मुलीला न्याय मिळावा यासाठी तिचा अंत्यसंस्कार न करता तिचा मृतदेह मीठाच्या खड्ड्यात पुरुन ठेवला होता. मुलीवर बलात्कार होऊनही तिचा खून झाला असतांना पोलिसांनी फक्त आत्महत्येचा गुन्हा नोदवुन घेतला. इतकेच नव्हे तर, शवविच्छेदन अहवालात देखील तिच्यावर अत्याचारांबाबत काही तपासणीच करण्यात आली नाही. असा आरोप करत पीडित बापाने ग्रामस्थांच्या मदतीने व्यवस्थेविरोधातच लढा सुरू केला होता.
याबाबतचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर नंदुरबार पोलीस तत्परता दाखवत १३ सप्टेंबर रोजी धडगाव तालुक्यातील खडक्या गावी शवविच्छेदनासाठी दाखल झाले होते. मात्र रंजिला वळवींचे वडील आणि गावकऱ्यांनी मात्र त्याठिकाणी शवविच्छेदनास विरोध दर्शवला होता. रंजिला वळवी यांच्या मृतदेहावर मुंबई येथे अथवा मुंबई येथील तज्ञांकडुन शवविच्छेदन करण्याची मागणी कुटुंबीयांनी गावकऱ्यांनी केली होती.

अखेर ४५ दिवसांनी रंजीलाचा मृतदेह मिठाच्या खड्ड्यातून बाहेर काढला
अखेर ४५ दिवसांनी धडगाव तालुक्यातील खडक्या येथील रंजिला वळवींचा मृतदेह बाहेर काढल्यात आला आहे. शवविच्छेदनात न्याय न मिळाल्याने आणि बलात्कार होऊन हत्या झाली असतांना केवळ आत्महत्येचा गुन्हाच दाखल झाल्याचा आरोप करत तिचे वडील अंतरसिंग वळवी यांनी अंतिम संस्कार न करता मृतदेह ४५ दिवसांपासून मिठाच्या खड्ड्यात पुरून ठेवला होता.
दोन दिवसांपासून पोलीस तिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन शवविच्छेदनासाठी तिच्या कुटुंबीयांची समजूत काढत होते. अखेर कुटुंबीयांनी केलेल्या मुंबईतील शवविच्छदेनाच्या मागणीला प्रतिसाद देत पोलीस आरोग्य पथकासह आज सायंकाळी घटनास्थळी दाखल झाले होते. पीडित कुटुंबाच्या मागणीनुसार मुंबईतील जे.जे रुग्णालयात रंजिला यांचा मृतदेह पुर्नशवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.