लखीमपूर : लखीमपूर खेरी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोन बहिणींच्या हत्येचा उलगडा केल्याचा दावा केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा लपवण्याच्या उद्देशाने दोन बहिणींना फूस लावून त्यांची हत्या करुन झाडाला लटकवले. त्या दरम्यान, बलात्कारातील आरोपी जुनैदची पोलिसांशी चकमक झाली, ज्यामध्ये त्याच्या पायाला गोळी लागली.

लखीमपूर खेरी येथे झाडाला लटकलेल्या दोन बहिणींचे मृतदेह आढळल्यानंतर विविध तर्क समोर येत होते. मात्र, पोलिसांनी तपास अधिक वेगाने केला. काही तासांतच पोलिसांनी झाडाला लटकलेल्या मृतदेहामागची कहाणी माध्यमांसमोर येऊन सांगितली. एसपी संजीव सुमन यांनी सांगितल्यानुसार, सर्व प्रथम दोन्ही आरोपी बहिणींना भेटण्यासाठी दुचाकीवरुन आले.

रामदास कदमांचे पुत्र आदित्य ठाकरेंना भिडणार; जशास तसं उत्तर देण्यासाठी रणनीती ठरली
दोन्ही बहिणींनी आरोपी सोहेल आणि जुनैद या दोघांशी आधीच ओळख होती. त्यानंतर दोघांनी दोन्ही बहिणींवर बलात्कार केला. बलात्कारानंतर दोघांनी लग्नासाठी दबाव टाकण्यासाठी सुरुवात केली. बहिणींनी नकार दिल्यानंतर सोहेल आणि जुनैद यांनी मिळून त्यांची हत्या केली. यानंतर करीमुद्दीन आणि आरिफ या दोघं नराधमांनी बहिणींचे मृतदेह झाडावर लटकवले.

आरोपींनी आधी दोन्ही बहिणींशी मैत्री केली, दोघींचा विश्वास जिंकला आणि नंतर त्याच नात्याच्या जोरावर बलात्कार, दुहेरी हत्याकांड असे गुन्हे घडल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. पोलिसांनी छोटू गौतमसह सोहेल, जुनैद, हफीझुल, करीमुद्दीन आणि आरिफ यांना अटक केली आहे. दोन बहिणींशी सोहेल आणि जुनैदशी भेट घडवून आणल्याचा आरोप छोटू गौतमवर आहे.

दोन्ही मुलींना फूस लावून पळवून नेल्याचा दावा मृतांचे कुटुंबीयांनी फेटाळला आहे. मृत बहिणीच्या भावाचे म्हणणे आहे की, घटना घडली तेव्हा पोलीस येथे उपस्थित नव्हते, आम्ही येथे होतो. आम्ही संपूर्ण घटना पाहिली आहे, माझ्या बहिणींना तीन तरुणांनी घरातून ओढत नेले.

यापूर्वी मृतांच्या आईनेही सांगितले की, ‘बुधवारी दुपारी ३ तरुणांनी त्यांच्या मुलींना पळवून नेले आणि नंतर त्यांची हत्या करुन मृतदेह झाडाला लटकवले. या घटनेतील आरोपी शेजारील लालपूर गावातील रहिवासी आहेत. आज तकसोबत बोलताना मुलींच्या आईने सांगितले की, तीन मुलांपैकी दोन मुलांनी त्यांच्या मुलींना ओढत नेले. त्यानंतर एका मुलाने दुचाकी सुरु केली आणि दोघांसह घटनास्थळावरुन पळ काढला.

फॉक्सकॉन अन् नवा प्रकल्प दोन्ही हवेत; सामंतांच्या नव्या प्रकल्पाच्या दाव्यावर अजित पवार भडकले

लखीमपूर खेरी प्रकरण नेमकं आहे तरी काय?

लखीमपूर गावाच्या हद्दीत दोन बहिणींचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले. या दोन्ही मुली दुपारी ३ वाजेपर्यंत घराच्या अंगणात होत्या. मात्र, संध्याकाळपर्यंत दोघीही निर्जीव प्रेतं बनून झाडावर लटकत होत्या. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार या दोन बहिणींवर अत्याचार झाले आहेत.

दोघींचे अपहरण करुन बलात्कार केला आणि त्यानंतर दोघींची हत्या करुन मृतदेह झाडाला लटकवण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. कुटुंब त्याच गावातील एका व्यक्तीकडे बोट दाखवत होते, ज्याचे नाव छोटू आहे आणि त्याचे घर काही मीटर अंतरावर आहे. पोलिसांनी आरोपी छोटूला अटक केल्यावर हा संपूर्ण प्रकार समोर आला आहे.

सलमानच्या कार वेगचा किती? पळून जाऊ लागला तर? बिश्नोई गँगनं आखला होता हत्येचा फूलप्रूफ प्लॅन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here