Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by रोहित धामणस्कर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Sep 16, 2022, 5:00 PM

vedanta foxconn project | पुणे जिल्ह्याचे सर्वात मोठे नुकसान झाले आहे. अडीच लाख कोटी रुपये निधी आपल्या जिल्ह्यात, महाराष्ट्रात येणार होता. दीड लाख मुलांना नोकऱ्या मिळणार होत्या. एवढी मोठी कंपनी दुसऱ्या राज्यात घालवली. आता ज्या नोकऱ्या गेल्या त्या कुणाच्या गेल्यात. आपल्याच मुलामुलींच्या नोकऱ्या गेल्या. या नोकऱ्या दुसऱ्या राज्यात घालवायचं काम या सरकारने केले, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली

 

Supriya Sule Eknath Shinde (1)
सुप्रिया सुळे आणि एकनाथ शिंदे

हायलाइट्स:

  • गरीब कष्ट करणाऱ्या मुलांचा तोंडचा घास काढून घ्यायचं पाप एकनाथ शिंदे यांनी केले
  • काही दिवसांनी कलेक्टर माझा फोनच घेणार नाही
  • बोलायचं कुणाला? जेव्हा पालकमंत्री होते तेव्हा पालकमंत्र्यांकडे जात होतो
इंदापूर: राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री इतके स्वार्थी आहेत की, स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी दीड ते दोन लाख युवकांना बेरोजगार केले, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. स्वतःला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणायचे आणि या गरीब कष्ट करणाऱ्या मुलांचा तोंडचा घास काढून घ्यायचं पाप एकनाथ शिंदे यांनी केले आहे. मुख्यमंत्री म्हणतात की, आम्ही महाराष्ट्रात वेदांता-फॉक्सकॉनपेक्षा मोठा प्रकल्प आणू. पण नवीन सरकार येऊनही अजून पालकमंत्र्यांची नियुक्ती झालेली नाही. लहानसहान कामांसाठीच पालकमंत्री असतात. ती करण्यासाठी नागरिक दरवेळी मुंबईला जाणार का, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. त्या शुक्रवारी इंदापूर येथील निमगाव केतकी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या.

अडीच महिने झाले पुण्याला पालकमंत्री नाही. पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास डी पी डी सी चे ८०० कोटी रुपयांची गोरगरीब जनतेच्या विकास कामांची पैसे थांबविले आहेत.हे कशासाठी तर हे फक्त मला करायचे यासाठी. हे सर्व पैसे राज्यातल्या गरीब जनतेचे आहेत. राज्यातील इतर सर्व कामंही अशाचप्रकारे थांबली आहेत.
मला तर वाटते काही दिवसांनी कलेक्टर माझा फोनच घेणार नाही . दररोज त्याला पाच फोन करते. बोलायचं कुणाला? जेव्हा पालकमंत्री होते तेव्हा पालकमंत्र्यांकडे जात होतो. मी आणि अजितदादा टीका करून एक आठवडा झाला तरी अजून काय पालकमंत्री नाही. मला आश्चर्य वाटतंय पालकमंत्री नाहीत, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.
वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात आलाच कधी होता, पुरावा दाखवा; आशिष शेलारांचं शिवसेनेला चॅलेंज
काल तर पुणे जिल्ह्याचे सर्वात मोठे नुकसान झाले आहे. अडीच लाख कोटी रुपये निधी आपल्या जिल्ह्यात, महाराष्ट्रात येणार होता. दीड लाख मुलांना नोकऱ्या मिळणार होत्या. एवढी मोठी कंपनी दुसऱ्या राज्यात घालवली. आता ज्या नोकऱ्या गेल्या त्या कुणाच्या गेल्यात. आपल्याच मुलामुलींच्या नोकऱ्या गेल्या. या नोकऱ्या दुसऱ्या राज्यात घालवायचं काम या सरकारने केले, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
Amol Mitkari : मिटकरींवर कारवाईची दाट शक्यता; पक्षाकडून आरोपांची गंभीर दखल, सूत्रांची माहिती
शरद पवार साहेब बोलले ते बरोबर आहे, महाराष्ट्राची लहान मुलाप्रमाणे समजूत काढण्याचे काम सुरु आहे. ही बाब दुर्दैवी आहे. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाऐवजी राज्यात दुसरा मोठा प्रकल्प आणण्याचे आमिष म्हणजे रडणाऱ्या मुलाची समजूत काढण्यासारखे आहे.वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प हा महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने पुणे जिल्ह्यातील युवकांच्या रोजगारावर मोठा परिणाम होणार आहे, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here