त्यांनी बँकांना शाखा स्तरावर नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांचा आढावा घेण्यास सांगितले. सीतारामन यांनी आयबीएला सांगितले की जर बँकांना कर्मचार्यांची जुळणी करण्यात समस्या येत असतील आणि असे कर्मचारी असतील, जे स्थानिक भाषेत संवाद साधू शकत नाहीत, तर त्यांना ग्राहकासमोरील नोकऱ्यांपासून दूर ठेवले पाहिजे. अर्थमंत्र्यांनी हे विधान अशा वेळी केले, जेव्हा सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांनी दक्षिण भारतातील शाखांमध्ये ग्राहकांना हिंदीत बोलण्यास सांगण्यात आल्याच्या घटनांनी सोशल मीडियावर संताप निर्माण केला आहे.
बँकर्सच्या म्हणण्यानुसार भरतीसाठी उत्तरेकडे अधिक कल आहे कारण दक्षिणेतील पदवीधर तरुण आयटी नोकऱ्यांना प्राधान्य देतात, ज्यात बदल्या होत नाहीत. “भरती करणार्यांना आता लोकांची भरती करण्यासाठी अधिक समजूतदार मार्ग अवलंबावे लागतील. तुम्हाला एखाद्या विशिष्ट प्रदेशात ‘x’ संख्येची गरज असल्यास, तुम्ही x आणि भाषा बोलू शकतील अशा आणखी काही लोकांची भरती केल्याची खात्री करा,” अर्थमंत्र्यांनी सांगितले. त्यांनी बँक कर्मचाऱ्यांना सांगितले की सर्वसमावेशकता क्रेडिटने संपत नाही आणि ती ऑपरेशन्सपर्यंत वाढवण्याची गरज आहे.
“भाषा शिकण्यात काय अडचण आहे? मी दक्षिणेकडची आहे. माझं बोलणं कमी असलं तरी मी थोडंसं हिंदी शिकण्याचा प्रयत्न करते. जोपर्यंत माझी कर्मभूमी येथे आहे, तोपर्यंत मला भाषा शिकायची आहे. मला समजू शकत नाही की IBA एखाद्या क्षेत्रात पोस्ट केलेल्या आणि त्या भागाची भाषा बोलू न शकणाऱ्या अधिकाऱ्यांना सहन कसे करते,” निर्मला सीतारामन यांनी म्हटले.
“मी कठोर शब्दात बोलते कारण तेच बँकिंगचे स्वरूप आहे. तुम्ही लोकांशी वागत आहात आणि तुम्ही त्यांचा व त्यांच्या भाषेचा आदर करू शकता,” अर्थमंत्री म्हणाले. पूर्वीच्या काळात बँका अडचणीतून बाहेर आल्या आणि त्यांच्या सर्व ताकदीच्या जोरावर त्या सक्षम झाल्याबद्दल अर्थमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.