अकोला : आज अकोल्याला मुसळधार पावसाने झोडपले असून अनेक रस्ते जयमय झाले आहेत. अकोला शहरातील मोठी उमरी भागात उमरी ते गुडधी रस्त्यावरील विठ्ठल नगर इथे रस्त्याला नदीचे स्वरूप आले होते. यामुळे अनेक वाहनधारकांना रस्त्यावरून वाहने काढण्यास चांगलीच कसरत करावी लागली. अनेकांची वाहने पाण्यामुळे बंद पडल्याने अडकून पडली होती. तसेच अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. याच परिसरात अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने घरातील साहित्य तसेच इतर वस्तूंचं मोठं नुकसान झाल आहे. (heavy rains in akola flooded roads and flooded people’s houses)

गेल्या पाच दिवसांपासून अकोल्यात विविध भागात पावसाची रिपरिप सुरू असून अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने पिकांना फटका बसला आहे. मागील चार दिवसात जिल्ह्यात मोठा पाऊस झालाय. याशिवाय पुढील काही दिवस विदर्भात अनेक भागात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, अकोला जिल्ह्यात १० सप्टेंबरपासून सलग पाऊस सुरू आहे. १४ सप्टेंबरलाही दुपारनंतर जोरदार पाऊस झाला होता. दरम्यान १२ सप्टेंबरला जिल्ह्याच्या विविध भागात मेघगर्जना, विजांच्या कडकडाटात वादळी पाऊस झाला.

Akola News : PSIने मागवलं हरणाचं मांस, वन विभागाचे कर्मचारी चक्रावले; आरोपींची चौकशी सुरू
दरम्यान, अमरावतीचे हवामान तज्ज्ञ प्राध्यापक अनिल बंड यांच्या अंदाजानुसार, विदर्भात पुढील सहा दिवस, २० सप्टेंबरपर्यंत पावसाची शक्यता दिली आहे. कमी दाबाचे क्षेत्र वायव्य मध्य प्रदेशवर निर्माण झाले असून ७.६ किमी उंचीवर चक्राकार वारे देखील वाहत आहेत. हे कमी दाबाचे क्षेत्र उत्तर-वायव्य दिशेने हळूहळू पुढे सरकत आहे. या वातावरणामुळे १५ ते २० सप्टेंबरदरम्यान विदर्भात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती.

पावसाने होत्याचं नव्हतं केलं; शेतकऱ्याने आत्महत्या करत जीवन संपवलं; रस्त्यावरच करावे लागले अंत्यसंस्कार
दरम्यान, पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे जनजिवन विस्कळीत झाले. जोरदार पावसामुळे त्यामुळे अनेक प्रकल्पांचे दरवाजे उघडावे लागले तर मध्यम प्रकल्प ओंसडून वाहत आहे.

Akola News : हरणाचे मांस खरेदी करणं पडलं महागात, आत्तापर्यंत आठ हरणांची शिकार; वाचा संपूर्ण प्रकार
शेकडो लघु प्रकल्प ओसंडून वाहत आहेत

तुर्तास ९ मोठ्या प्रकल्पांपैकी ८ तर २७ मध्यम प्रकल्पांपैकी २० आणि शेकडो लघु प्रकल्प ओंसडून वाहत आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून मोठ्या प्रकल्पांपैकी अमरावती जिल्ह्यातील ऊर्ध्व वर्धा, यवतमाळ जिल्ह्यातील पुस, अरुणावती, बेंबळा. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा, वान. बुलडाणा जिल्ह्यातील पेनटाकळी, खडकपूर्णा या प्रकल्पातून पाण्याचा प्रवाह पाहून विसर्ग केला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here