india wants to be trillion dollar economy | केंद्र सरकारने भारतीय अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलर्सची करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. त्यादृष्टीने वाटचाल करण्यासाठी महाराष्ट्रात स्वतंत्र संस्था स्थापन होईल. ही संस्था सरकारी मालमत्तांचे निर्गुंतवणुकीकरण, कृषी क्षेत्रात ब्लॉकचेन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरत, दळणवळण अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करेल. नीती आयोगाचे सीईओ आणि प्रमुख अधिकाऱ्यांसमोर या सगळ्याचे प्रेझेंटेनश देण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

हायलाइट्स:
- महाराष्ट्रात निती आयोगाच्या धर्तीवर इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफर्मेनशन
- संस्था उभारण्याला मुख्यमंत्र्यांनी तत्वत: मान्यता दिली
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडल्याचे सांगितले. या बैठकीला निती आयोगाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्राकडून निती आयोगाच्या धर्तीवर राज्यात स्वतंत्र संस्था उभारण्यासंदर्भातील प्रस्तावाचे सादरीकरण करण्यात आले. निती आयोगानेही यावर काही सूचना मांडल्या आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात निती आयोगाच्या धर्तीवर इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफर्मेनशन ही संस्था उभारण्याला मुख्यमंत्र्यांनी तत्वत: मान्यता दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले. आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल. त्यानंतर या संस्थेची एकूण रचना आणि कामाचे स्वरुप याविषयी माहिती देऊ, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
केंद्र सरकारने भारतीय अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलर्सची करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. त्यादृष्टीने वाटचाल करण्यासाठी महाराष्ट्रात स्वतंत्र संस्था स्थापन होईल. ही संस्था सरकारी मालमत्तांचे निर्गुंतवणुकीकरण, कृषी क्षेत्रात ब्लॉकचेन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरत, दळणवळण अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करेल. नीती आयोगाचे सीईओ आणि प्रमुख अधिकाऱ्यांसमोर या सगळ्याचे प्रेझेंटेनश देण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी फडणवीस यांनी राज्याच्या विविध भागांत पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीच्या भरपाईसंदर्भात भाष्य केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संततधार पावसामुळे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा केली आहे. लवकरच या सर्व भागांमध्ये पंचनामे केले जातील. त्यानंतर नुकसानभरपाई संदर्भात राज्य सरकारकडून आदेश काढले जातील, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
फडणवीस भाकरी महाराष्ट्राची खातात आणि चाकरी गुजरातची करतात; राष्ट्रवादी नेत्याचा घणाघात
देवेंद्र फडणवीसांकडून महाराष्ट्र ATS च्या कामगिरीचे कौतुक
महाराष्ट्र एटीएसने रविवारी नालासोपारा परिसरातून १५ लाखांचे इनाम डोक्यावर असलेल्या नक्षलवाद्याला अटक केली होती. या नक्षलवाद्याला आता झारखंड सरकारच्या ताब्यात दिले जाणार आहे. या कामगिरीबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र ATS चे कौतुक केले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.