Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Sep 18, 2022, 8:40 PM

Jalna News : आम्हाला पेंग्विन सेना म्हणून डिवचले आता यांनी चित्ते भारतात आणले आहे त्यामुळे यांना चित्ते पार्टी म्हणायचं का? असा सवाल युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी उपस्थित केला. ते जालन्यात बोलत होते.

 

Varun Desai
Varun Desai : शिवसेनेला पेंग्विन सेना म्हणणाऱ्या भाजपला वरुण देसाईंचं जशास तसं प्रत्युत्तर, म्हणाले…

हायलाइट्स:

  • आम्हाला पेंग्विन सेना म्हणून डिवचले
  • यांनी चित्ते आणले त्यामुळे यांना चित्ते पार्टी म्हणायचं का?
  • युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाईंचा सवाल
जालना : शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील झुमध्ये पेंग्विन आणले आणि यापासून पर्यटकांची गर्दी वाढून महापालिकेचं उत्पन्न वाढलं. मात्र, तेव्हापासून यांनी आम्हांला पेंग्विन सेना म्हणून डिवचले. आता यांनी चित्ते भारतात आणले आहे त्यामुळे यांना चित्ते पार्टी म्हणायचं का? असा सवाल युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी उपस्थित केला आहे.

ज्या दिवशी निवडणुका जाहीर होतील या ४० लोकांचा टांगा पलटी तर होणारच आहे, १०० टक्के होणार पण हे जे आहेत ना ज्यांना असे वाटते की ते देशाचे नेते आहेत. एकी काळी प्रदेशाध्यक्ष होते. काय ते किती भोकाचा पन्ना (पाना) काय काय ती भाषा आम्हाला तर कळत पण नाही. यांना असा वाटतं की शिवसेना आता संपली. यांच्या मतदार संघात सुध्दा त्यांनी एकदा फिरून पाहावं आणि जनतेच्या मनात नक्की काय हे कळेल, असं म्हणत सरदेसाईंनी रावसाहेब दानवे यांना देखील टोला लगावला आहे.

Eknath Shinde : राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्री शिंदेंची तोफ धडाडणार, सभेची जय्यत तयारी
सगळे रोजगार गुजरातला पळवले, बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद जोडत आहेत, लोकप्रतिनिधी अमराठी बनवताये. ही केवळ शिवसेनेच्या अस्तित्वाची लढाई नसून ही लढाई मुंबई आणि महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या अस्तित्वाची आहे, असंही वरुण सरदेसाई यावेळी म्हणाले.

हे गलिच्छ राजकारण थांबवा, दसरा मेळाव्याच्या वादावर अरविंद सावंतांची प्रतिक्रिया

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here