Maharashtra Politics Shivsena vs Eknath Shinde camp | या सभेत रामदास कदम यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर सडकू टीका केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर आदित्य ठाकरे यांनी रामदास कदमला संपवण्याचा एककलमी कार्यक्रम सुरु केला होता. २०१४ मध्ये सत्ता आल्यानंतर मला नाईलाजाने मंत्रीपद द्यावे लागले. नाहीतर शिवसेनेत असताना मी कधीही मंत्री झालो नव्हतो, असे रामदास कदम यांनी म्हटले.

 

Rashmi Thackeray Ramdas Kadam
रामदास कदमांची ठाकरेंवर टीका

हायलाइट्स:

  • माँसाहेब मीनाताई ठाकरे या आयुष्यात कधीही व्यासपीठावर चढल्या नाहीत
  • ते मातोश्रीवर लपून खोके मोजण्याचे काम करत होते
  • रश्मी ठाकरे या वर्षा बंगल्यावर कंत्राटदारांना भेटत होत्या
रत्नागिरी: आदित्य ठाकरे यांच्यापेक्षा भरत गोगावले यांना मंत्रिपदं दिले असते. पण वडील मुख्यमंत्री झाल्यावर आदित्य ठाकरे यांना लगेच कॅबिनेट मंत्री व्हायचे होते. एवढचं कशाला, रश्मी ठाकरे यांचा मंत्रिमंडळात कसा समावेश झाला नाही, याचं मला आश्चर्य वाटतं, अशी खोचक टिप्पणी एकनाथ शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केले. ते रविवारी दापोलीत आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते. यावेळी रामदास कदम यांनी ठाकरे कुटुंबीयांवर वैयक्तिक पातळीवर अत्यंत बोचरी टीका केली.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते कुठेही गेले तरी रश्मी वहिनी त्यांच्यासोबत असायच्या. माँसाहेब मीनाताई ठाकरे या आयुष्यात कधीही व्यासपीठावर चढल्या नाहीत. मी शिवसेनेत उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना केवळ तीनवेळा मंत्रालयात गेले आहेत. इतरवेळी ते मातोश्रीवर लपून खोके मोजण्याचे काम करत होते. तर रश्मी ठाकरे या वर्षा बंगल्यावर कंत्राटदारांना भेटत होत्या, असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला. त्यामुळे आता यावर आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते काय प्रत्युत्तर देणार हे पाहावे लागेल.
आदित्य ठाकरेंना मी फोन केला होता, पण…; योगेश कदमांनीही गंभीर आरोप करत ‘मातोश्री’ला डिवचलं
बाळासाहेबांचा मुलगा आहे, हे वारंवार कशाला सांगता: रामदास कदम

मी शिवसेनेत ५२ वर्षे काम केले आहे. अनेक केसेस अंगावर घेतल्या आहेत, अनेकदा जेलमध्ये गेलो आहे. उद्धवजी ही शिवसेना तुम्ही मोठी केलेली नाही. अनेक शिवसैनिकांन खस्ता खाल्ल्यानंतर हा पक्ष मोठा झाला आहे. उद्धव ठाकरे हे वारंवार मी बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा आहे, असे सांगत असतात. अरे पण ही गोष्ट किती वेळा सांगायची. तुम्ही बाळासाहेबांचे पुत्र आहात, याबाबत संशय आहे का? तुम्ही बाळासाहेबांचे पुत्र नाहीत, असे आम्ही म्हटले आहे का? मग तुम्हाला हे वारंवार का सांगावे लागत आहे. तुमच्यात स्वत:मध्ये काही कर्तृत्व आहे की नाही, असा सवाल रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना विचारला.
अंबानींनी कोर्टात ३२ वकील उभे केले होते, पण शेवटी मीच जिंकलो: रामदास कदम
उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना फसवलं: रामदास कदम

रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची फसवणूक केल्याचा आरोपही केला. महाविकास आघाडी सरकार स्थापन होताना मढ येथील बंगल्यात एक बैठक झाली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे बोट दाखवून, ‘या माझ्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करा’, असे म्हटले होते. मात्र, त्यानंतर एका रात्रीत काय घडलं ते माहिती नाही. पण संजय राऊत हे शरद पवार यांच्या बंगल्यावर गेले. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आले की, माझी बायको रडत आहे, डोकं आपटून घेत आहे. तू मुख्यमंत्री हो, मला वर्षा बंगल्यावर जायचं आहे. यानंतर उद्धव ठाकरे एका रात्रीत मुख्यमंत्रीपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाले. दुसऱ्या दिवशीच्या बैठकीत शरद पवार यांनी अचानकपणे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नावाची घोषणा केली. अशाप्रकारे एकनाथ शिंदे यांची फसवणूक करण्यात आली, असे रामदास कदम यांनी म्हटले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here