MaTa Superwoman : पोटच्या लेकराला गतीमंदत्व आलं म्हणून ही माऊली ८० मुलांची आई झाली; वाचा हर्षाली चौधरींचा प्रेरणादायी प्रवास
दरम्यान, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि घाट माथ्यावरदेखील मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. दरम्यान, पुढच्या दोन दिवसांमध्ये उत्तर भारताच्या काही भागांतून नैऋत्य मान्सून परतीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा इशारा…
महाराष्ट्रात विदर्भातील अमरावती, अकोला, नागपूर, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या भागांमध्ये २० ते २२ सप्टेंबर या काळात विजेच्या कडकडाटासह पाऊस होईल. पुणे, नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे, सोलापूर, औरंगाबाद, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्येही पुढच्या तीन-चार दिवसांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. इतकंच नाहीतर मुंबई, ठाण्यासह संपूर्ण कोकणात पावसाचा जोर कमी राहील अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.