बंगळुरू: देशातील महानगरांमध्ये वाहतूककोंडीची समस्या नित्याची बाब झाली आहे. अनेकदा वाहतूककोंडीमुळे प्रवासाचा वेळ दुपटीनं, तिपटीनं वाढतो. मुंबई, दिल्ली, पुणे, चेन्नई, बंगळुरू यासारख्या शहरांमध्ये कित्येक तास वाहतूककोंडीत जातात. वाहतूककोंडीमुळे चालक, प्रवासी त्रस्त होतात. मात्र याच वाहतूककोंडीमुळे एका व्यक्तीचं आयुष्य बदललं आहे.

वाहतूककोंडीमुळे एका व्यक्तीला आयुष्याचा जोडीदार मिळाला. सोशल मीडियावर या व्यक्तीची पोस्ट व्हायरल झाली आहे. एका रेडइट वापरकर्त्यानं त्याच्या आयुष्यात घडलेला किस्सा सांगितला आहे. बंगळुरूतील वाहतूककोंडी दरम्यान एका तरुणीच्या प्रेमात पडलो आणि पुढे त्या तरुणीसोबत लग्न झालं, असा जबरदस्त किस्सा रेडइट वापरकर्त्यानं शेअर केला असून हा किस्सा लक्षवेधी ठरला आहे.
बाईक काढताना तोल गेला, तरुण खड्ड्यात पडला; पण नशीब बलवत्तर निघालं; पाहा VIDEO
रेडइट वापरकर्त्यानं सांगितला किस्सा
एक दिवस मी माझ्या मैत्रिणीला घेऊन निघालो होतो. तिला एका ठिकाणी सोडायचं होतं. मी सोनी सिग्नलजवळ पोहोचलो आणि प्रचंड वाहतूककोंडीत अडकलो. त्यापुढे एजीपुरा उड्डाणपुलाचं काम सुरू होतं. त्यामुळे मोठी वाहतूककोंडी निर्माण झाली होती. आम्हाला खूप भूक लागली होती. त्यामुळे आम्ही रस्ता बदलला. एका हॉटेलमध्ये डिनरला गेलो. ते आमचं पहिलं रोमँटिक डिनर ठरलं. ज्या तरुणीसोबत डिनरला गेलो होतो, तिच्याशी माझी छान मैत्री झाली. त्या दिवसापासून आम्ही एकमेकांच्या जवळ आलो. जवळपास ३ वर्षे तिला डेट केल्यावर मी त्या तरुणीशी लग्नही केलं, असा किस्सा रेडइट वापरकर्त्यानं सांगितला आहे.
पोटात चार कॅप्सूल, त्यात १ किलो सोनं; तस्काराला घेऊन पोलीस विमानतळावरून थेट रुग्णालयात
आमच्या लग्नाला २ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र आम्ही ज्या उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतूककोंडीत अडकलो, त्या उड्डाणापुलाचं काम अद्याप सुरुच आहे, असं वापरकर्त्यानं त्याच्या पोस्टच्या शेवटी नमूद केलं आहे. या पोस्टला आतापर्यंत ४ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी वाहतूककोंडीतील त्यांचे अनुभवदेखील शेअर केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here