मुंबई : महिंद्रा फायनान्सचे शेअर्स, जे भारतातील ट्रॅक्टर खरेदीसाठी कर्ज देतात, आरबीआयने कठोर कारवाई केल्यामुळे शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. आज कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल १३ टक्क्यांची मोठी घसरण नोंदवली गेली. शेअर २२५ रुपयांवरून थेट १९५ रुपयांवर घसरला.

अदानी ग्रूपची बल्ले बल्ले! या कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान तेजी, मार्केट कॅप पुन्हा १ लाख कोटींच्या पार
आरबीआयने काल कंपनीला आदेश दिला की महिंद्र आणि महिंद्रा फायनान्शिअल सर्व्हिसेसने (Mahindra and Mahindra Financial Services) कर्जाच्या वसुलीसाठी कोणत्याही इतर एजंट्सचा वापर बंद करावा. म्हणजेच कंपनी आरबीआयच्या पुढील ऑर्डरपर्यंत आउटसोर्सिंग सिस्टमद्वारे कर्ज वसूल करू शकणार नाही. कंपनीने आज शेअर बाजाराला माहिती दिली आहे की यामुळे कर्जाच्या वसूली प्रक्रियांमध्ये घट होऊ शकते.

आठवडाभर शेअर बाजारात अस्थिरता, शेवटच्या दिवशीही घसरण कायम
पीटीआयने १६ सप्टेंबर रोजी एका अहवालात माहिती दिली होती की कंपनीच्या कर्जवसूली एजंटने झारखंडच्या हजारीबाग येथील अपंग शेतकर्‍यांच्या घरातून जबरदस्तीने ट्रॅक्टर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, शेतकऱ्याच्या २७ वर्षांच्या गर्भवती मुलीचा चिरडून मृत्यू झाला. ही घटना १५ सप्टेंबर रोजी आहे.

सुप्रीम कोर्टाचा एक आदेश अन् शेअर गडगडला, एका दिवसात कोणत्या कारणाने आली मोठी घसरण
यावर महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्र यांनी दु: ख व्यक्त केले होते आणि आता आरबीआयने यावर कठोर कारवाई केली आहे. महिंद्रा फायनान्सवरील रिकव्हरी एजंट्सद्वारे कर्ज वसूलीवर बंदी घातली आहे आणि आता केवळ कंपनीचे कर्मचारी हे काम करू शकतात.

आरबीआयच्या निर्णयाचा परिणाम
आरबीआयच्या बंदीनंतर महिंद्रा फायनान्सने आज एका एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली की यामुळे कर्ज परतफेड न झालेल्या वाहनांच्या ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेत तात्पुरती घट होईल. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, साधारणपणे कंपनी दर महिन्याला ४-५ हजार वाहने थर्ड पार्टी आणि त्यांच्या कर्मचार्‍यांमार्फत परत घेते, परंतु आता ती ३-४ हजारांवर येऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here