मुंबईः मुंबई लोकलमध्ये एका २१ वर्षीय महिलेचा विनयभंग झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. मानसिक दृष्ट्या अस्थिर व्यक्तीने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. मात्र, आता या प्रकरणात पीडित तरुणीने रेल्वे पोलिसांवरच असंवेदनशील असल्याचा ठपका ठेवला आहे. तरुणीने ट्विटरच्या माध्यमातून घडलेला प्रकार कथन केला आहे. जीआरपी कमिशनर केसर खालिद यांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले असून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे.

ही महिला खासगी कामासाठी जोगेश्वरीला जात असताना अंधेरी ते जोगेश्वरी स्थानकांदरम्यान महिलांच्या फर्स्ट क्लास डब्यात असताना एका व्यक्तीने अयोगरित्या स्पर्श करत विनयभंग केला. त्यानंतर रेल्वे जोगेश्वरी स्थानकाजवळ येताच बाहेर उडी मारून पळून गेला. या घटनेनंतर घाबरलेल्या महिलेने अंधेरी रेल्वे पोलिस स्थानकात तक्रार देण्यासाठी पोहोचली.

वाचाः ८ लाखांचे श्रवणयंत्र मिळाले मोफत; दुर्मिळ व्याधी असलेल्या रौनकसाठी धावले केईएमचे डॉक्टर

अंधेरी जीआरपी चौकीत येण्याआधी पीडितेने शहराच्या दोन पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी ती रडत व घाबरलेल्या स्थितीत होती. तिने पोलिसांना विनयभंग झाल्याचे सांगत महिला पोलिसांसोबत बोलायचे आहे असे सांगितले. यावर पोलिसांनी तिला ‘विनयभंग’ या शब्दाचा अर्थ काय? असा प्रश्न विचारला. व गुन्हेगार हा तिचा प्रियकर आहे का, असा सवालही महिलेला केला असल्याचा दावा तिने केला आहे. या नंतर या महिलेला सीसीटीव्ही फुटेज दाखवण्यात आले. तिने गुन्हेगाराला ओळखले असता, एक महिला पोलीस कर्मचारी तिला म्हणाली ती वकील असल्याने तिने त्या माणसाला मारायला हवे होते. महिलेची चौकशी करत असताना एकच घटना तिला तीन ते चार वेळा कथन करायला लावली. तब्बल तीन तास तिचा जबाब नोंदवण्यात आल्याचा आरोपही या महिलेने केला आहे.

mumbai-local-

ज्या ठिकाणी महिलेचा लैंगिक छळ झाला आहे, ते बोरिवली रेल्वे पोलिसांनच्या हद्दीत येतं. आणि ही माहिती त्यांना पाठवण्यात येईल असे या महिलेला सांगण्यात आले. या नंतर या महिलेला संध्याकाळी बोरिवली रेल्वे पोलिस ठण्यातून पुन्हा फोन आला, सीसीटीव्ही फुटेजमधील गुन्हेगार ओळखण्यासाठी तिला पुन्हा एकदा बोलावून घेण्यात आले, असंही या महिलेनं म्हटलं आहे. मला पुन्हा पोलिस ठाण्यात जावे लागले ही घटना माझ्या आयुष्यातील त्रासदायक घटना होती.

woman molested in mumbai local

हे लिहिण्याचा माझा एकमेव उद्देश म्हणजे पोलिसांनी दलाला संवेदनशील बनवावे आणि विशेषत: अशा संवेदनशील घटनांसाठी त्यांच्या स्वतःच्या कर्तव्यांसाठी जागरूक आणि जबाबदार बनवावे, अशी नम्र विनंती आहे, असं ट्वीट तिनं केलं आहे.

वाचाः भारतात सापडला १२ हजार वर्षांपूर्वीचा प्राचीन खजिना; चार कालखंडातील सोने, मोती अन् हत्यारे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here