नवी दिल्ली : देशातील आयटी कंपन्या मूनलाइटिंगसाठी म्हणजेच प्रतिस्पर्धी कंपन्यांसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करत आहेत. त्याचवेळी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी कर्मचाऱ्यांच्या बाजूने वक्तव्य केले आहे. आयटी मंत्रालयाचे राज्यमंत्री चंद्रशेखर म्हणाले की, कर्मचार्‍यांवर ताशेरे ओढणे चुकीचे आहे आणि त्यांना त्यांची स्वप्ने पूर्ण करू द्यावीत. मूनलाइटिंगवर पहिल्यांदाच केंद्रीय मंत्र्याने वक्तव्य आले आहे.

मूनलायटिंग म्हणजे काय; नक्की काय आहे हा प्रकार, जाणून घ्या काय सांगतात नियम
९व्या वार्षिक फोरम ऑफ पब्लिक अफेअर्स फोरम ऑफ इंडिया (PAFI) मध्ये राजीव चंद्रशेखर म्हणाले, “कंपन्यांनी त्यांच्या कर्मचार्‍यांवर ताशेरे ओढू नयेत. कर्मचार्‍यांक त्यांनी स्वप्ने रोखू नयेत.” केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले की, कराराअंतर्गत कर्मचार्‍यांना कोणतेही बंधन न ठेवता त्यांना हवे ते काम करण्याची मुभा देण्यात यावी. कार्यसंस्कृती बदलली असून ती ओळखणाऱ्या कंपन्या यशस्वी होतील असे ते म्हणाले. “प्रत्येकाला पैसा हवा असतो आणि अधिक कमवायचे असते.”

मूनलाइटिंग प्रकरणात दिग्गज IT कंपनीची मोठी कारवाई, ३०० कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड
विप्रोकडून ३०० कर्मचाऱ्यांची हकालपट्टी
केंद्र सरकारच्या मंत्र्याचे हे विधान महत्त्वाचे आहे कारण नुकतेच विप्रो, या दिग्गज आयटी कंपनीने मूनलाइटिंगमुळे ३०० कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. विप्रोने कर्मचार्‍यांनी मूनलाइटिंग करणे ही कंपनीची फसवणूक असल्याचे म्हटले आहे. याशिवाय इन्फोसिसने देखील कर्मचाऱ्यांना अंतर्गत मेलद्वारे इशाराही दिला आहे. तर TCS आणि आयबीएमसारख्या आयटी कंपन्याही मूनलाइटिंगला कडाडून विरोध करत आहेत. “कर्मचाऱ्यांना त्यांच्या कौशल्याने अनेक गोष्टी साध्य करायच्या आहेत आणि ही एक कल्पना आहे ज्याची वेळ आली आहे,” असेही केंद्रीय मंत्री म्हणाले.

आता गुपचूप काम करणे महागात पडेल, दिग्गज IT कंपनीने कर्मचाऱ्यांना दिला इशारा
मूनलाइटिंग म्हणजे काय?
जेव्हा एखादा कर्मचारी त्याच्या नेहमीच्या नोकरीशिवाय पैसे कमवण्यासाठी एकाच वेळी इतर काम करतो तेव्हा त्याला मूनलाइटिंग म्हणतात. करोनाच्या काळात घरातून काम केल्यामुळे मूनलाइटिंगचा कल वाढला आहे. यामुळे कामगिरी आणि कामावर परिणाम होत असल्याचे आयटी कंपन्यांचे मत आहे. एका ईमेलमध्ये, इन्फोसिसने म्हटले की ते “दुहेरी रोजगाराला मान्य करत नाही”.

त्याचवेळी, कंपन्या पगारवाढ किंवा प्रोत्साहन इत्यादींमध्ये टाळाटाळ करत असल्याचा कर्मचार्‍यांचा युक्तिवाद आहे. म्हणूनच कर्मचारी शक्य तितक्या वेळ नवीन पर्याय शोधत आहेत, ज्यामधून त्यांना काही पैसे मिळतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here