आता भाजपचं वर्चस्व, गर्वपणा, सत्तेची त्यांच्यामध्ये चढलेली नशा काही दिवसात उतरेल. त्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य म्हणजेच दुसऱ्याचं घर तोडायचं आणि आपलं घर बनवायचं, हे जास्त दिवस टिकत नाही. त्यामुळे त्यांना जेव्हा तोडायचे तेवढे तोडा, जनता त्यांना जागा दाखवेल. असं वक्तव्य त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केलं आहे. ते वाशिमच्या दौऱ्यावर जात असताना ते अकोल्यात बोलत होते.
शिवाजी पार्कच्या मैदानासंदर्भात काल शिवसेनेच्या बाजूने लागलेल्या कोर्टाच्या निकालावर पटोले बोलताना म्हणाले की, राज्यातील सरकार स्वतःच कायदा सुव्यवस्था बिघडवत आहे. आपण पाहिलं असणार दरवर्षी होणाऱ्या शिवाजी पार्कवर दसऱ्याच्या दिवशी मेळावा होत आहे. तो बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून होतोय. काँग्रेसच्या राजवट काळातही त्यांचा मेळावा भरायचा. त्यांनी ती परंपरा कायम ठेवलेली होती. त्या परंपरालाही काँग्रेस नेहमी त्यावेळी सहकार्य करायची. पण आता जे नवीन हिंदूहृदय सम्राट झालेले आहेत ते आता हिंदूच्या परंपरेला विरोध करताना पाहतोय, असा थेट टोला नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.
पुढे महाराष्ट्रच्या कायदा सुव्यवस्थेबाबत बोलताना म्हणाले की त्यांच्या ग्रुपचा एक आमदार स्वतःच मुंबईत गणेश उत्सवामध्ये बंदूक चालविताना आपण पाहिलं. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले असून बंदुकीच्या गोळ्या सापडल्या. अशाप्रकारे कायदा सुव्यवस्था बिघवडण्याचा सरकारच प्रयत्न करत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सगळ्यात मोठी घातक व्यवस्था निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत काल कोर्टाने दिलेल्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली तर जनतेसह राज्याचे मोठं नुकसान होणार होईल. त्यामुळे कोर्टाने दिलेल्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतोय, असंही पटोले यावेळी म्हणाले.
खरा दसरा मेळावा शिंदेचाच; ठाकरेंना शिवतीर्थावर परवानगी मिळाल्यानंतर शीतल म्हात्रेंची प्रतिक्रिया