लोणावळा : महाराष्ट्रातील तरुणांना स्वतःच्या राज्यात आपल्या हक्काच्या रोजगारासाठी लाठी खावी लागते हे दुर्दैव आहे. राज्यात येणारे विकासाचे प्रकल्प व उद्योग हे या सरकारच्या बेफिकीरीमुळे शेजारच्या राज्यात जात आहे. यामुळे राज्यातील युवक रोजगाराच्या प्रतीक्षेत असून, रोजगार व नोकरीच्या शोधात फिरत आहे. मावळात येणारा लाखो कोटींचा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे स्थानिकांसह सुमारे एक लाख युवकांच्या रोजगारांच्या संधी हिरावल्या गेल्या आहेत. राज्यातील सध्याचे हे सरकार नसून, ती एक सर्कस आहे. सध्या राज्यातील तरुणांचा रोजगार जातोय . महाविकास आघाडी सरकार असते, तर वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात आणलाच असता, पण खोके सरकारच्या गलथान कारभार व अज्ञानामुळे तो गुजरातमध्ये गेला. हे महाराष्ट्राचे दुर्दैव असून, या खोके व बेकायदेशीर सरकार आणि गद्दारांना धडा शिकवायची वेळ आली असल्याचे वक्तव्य माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केले . (Aditya Thackeray said that this is a circus government and we do not know who is the real Chief Minister)

फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याच्या निषेधार्थ वडगाव मावळ येथे शिवसेनेच्या वतीने काढण्यात आलेल्या जनाक्रोश मोर्चात अदित्य ठाकरे बोलत होते. या जनआक्रोश आंदोलनात शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख माजी मंत्री सचिनभाऊ अहिर यांच्या शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खोके सरकारला गाजर मिळालं,महाराष्ट्राच्या तरुणाईला रोजगार हवाय, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
यावेळी पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, प्रत्येक राज्याला वाटते आपल्या राज्याचा विकास व्हावा. यासाठी विकासाचे मोठमोठे प्रकल्प व उद्योग यावेत, राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगार व नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात. मात्र राज्यात आमच्या व विशेषतः राज्यातील युवकांच्या पाठीत खंजीर खुपसून तयार झालेल्या अवैध गद्दार खोके सरकारच्या डोळ्यासमोर राज्यातील प्रकल्प गुजरातला गेला. असे सांगत “चाळीस आमदारांसोबत मीही राजीनामा देतो , सर्वांनी निवडणुकीला सामोरे जाऊ , असे आवाहनही ठाकरे यांनी विरोधकांना केले, आम्ही, केंद्राला किंवा गुजरातला दोष देत नाही. हा दोष खोके सरकारचा आहे . महाराष्ट्रातल्या राजकीय अस्थिरतेचा फायदा गुजरातने घेत आपल्या राज्यात होऊ घातलेला फॉक्सकॉन प्रकल्प हिरावून घेतला.

पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा: आंदोलनातील VIDEO व्हायरल; मात्र पोलिसांचा वेगळाच दावा
खरे मुख्यमंत्री कोण हेच कळत नाही- आदित्य ठाकरे

सध्या राज्याचे खरे मुख्यमंत्री कोण हेच कळत नाही . माझ्या गटात कोण येतंय त्यापेक्षा महाराष्ट्रात रोजगार कोण आणतंय ते पाहा . आमच्यावर चाळीस वार केलेत पण राज्यातल्या जनतेवर वार करू नका. शिंदे सरकार हे सरकार नसून ती एक सर्कस आहे. हे सरकार कधीही कोसळेल याचा नेम नाही. असा टोलाही आदित्य ठाकरेंनी यावेळी बोलताना लगावला.

आरोग्य सुविधांसाठी उभारणार कॉल सेंटर; तानाजी सावंत यांची घोषणा
वेदांता फॉक्सकॉन ही कंपनी मावळ तालुक्यासाठी तसेच पुणे जिल्हा व महाराष्ट्रासाठी मोठा रोजगार देणारा प्रकल्प होता . मात्र महाराष्ट्रावर अन्यात करत ही कंपनी गुजरातला नेण्यात आली आहे. यामुळे महाराष्ट्रातील सुमारे लाखभर युवकांना मिळणारा रोजगार बुडाला आहे . सदरची कंपनी पुन्हा महाराष्ट्रात व पुणे जिल्ह्यातील मावळात यावी, यासाठी व आमचा रोजगार, आमचा हक्क या मागणीसाठी हे जनआक्रोश आंदोलन करण्यात आले असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here