BMC Election 2022 | ग्राहकांना मांस पुरवठा करण्यासाठी मोठया संख्येने प्राणी, पक्षी, सागरी जीवांना निर्दयपणे मारले जाते. मांस, मासे आदींशी संबंधित जाहिराती पाहणे हे जैन समाजाच्या आणि इतर शाकाहारी नागरिकांच्या धार्मिक भावना दुखविणारे व शांतता बिघडविणारे आहे’, असेही जैन याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ मांसाहारी चिते नामीबियातून आणले व मध्य प्रदेशच्या जंगलात वाजत गाजत सोडले. ते चित्ते काय जंगलात दही खिचडी, तूप-रोटी खाणार आहेत?

 

PM Modi Uddhav Thackeray
पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे

हायलाइट्स:

  • दिल्लीश्वरांना मुंबईवरून भगवा हटवायचा आहे
  • जैन संघटनांना पुढे करुन शाकाहार, मांसाहार वादास नवी फोडणी द्यायचा प्रकार
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून टेलिव्हिजनवर दाखवण्यात येणाऱ्या मांसाहारी खाद्यपदार्थांच्या जाहिरातींचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहेत. मांसाहरी खाद्यपदार्थांच्या जाहिराती बंद कराव्यात, अशा मागणीची याचिका काही जैन संघटनांकडून न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली होती. या सगळ्यामागे राजकारण असल्याचा आरोप शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून करण्यात आला आहे. दिल्लीश्वरांना मुंबईवरून भगवा हटवायचा आहे. त्यासाठी भाजपकडून मुंबईत ‘मराठी कट्टा’, ‘मराठी दांडिया’ यासारखे उपक्रम राबवले जात आहेत. इथे मराठी लोकांमध्ये वितुष्टाचे दांडिये घुमवायचे तर दुसऱ्या बाजूला जैन संघटनांना पुढे करुन शाकाहार, मांसाहार वादास नवी फोडणी द्यायचा प्रकार सुरु असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

मांसाहारी खाद्यपदार्थांच्या जाहिरातींवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी काही जैन संघटना उच्च न्यायालयात गेल्या. पण तेथे न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली. मांसाहारी खाद्य पदार्थांच्या जाहिराती पाहायच्या नसतील तर टी.व्ही. बंद करा असा फटका न्यायालयाने मारला. ‘मांसाहारी खाद्य पदार्थांच्या जाहिरातीमध्ये पक्षी, प्राणीहत्येला प्रोत्साहन देण्यात येते. ग्राहकांना मांस पुरवठा करण्यासाठी मोठया संख्येने प्राणी, पक्षी, सागरी जीवांना निर्दयपणे मारले जाते. मांस, मासे आदींशी संबंधित जाहिराती पाहणे हे जैन समाजाच्या आणि इतर शाकाहारी नागरिकांच्या धार्मिक भावना दुखविणारे व शांतता बिघडविणारे आहे’, असेही जैन याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ मांसाहारी चिते नामीबियातून आणले व मध्य प्रदेशच्या जंगलात वाजत गाजत सोडले. ते चित्ते काय जंगलात दही खिचडी, तूप-रोटी खाणार आहेत? मोदींचे सरकार त्यांना चांगला मासाहार पुरवत आहेत. हा काय मांसाहार, हिंसाचार नाही का, असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे.
कितीही अफजल खान आले तरी घाबरणार नाही, सुप्रीम कोर्टातील सुनावणीदरम्यान ठाकरेंची प्रतिक्रिया
मुंबईतील अनेक भागातील हाऊसिंग सोसायटयात मांसाहारी मंडळींना ‘घर’ बंदी आहे. मांसाहार करणाऱ्याना घर आणि प्रवेश नाकारला जातो. मात्र या मांसाहार करणाऱ्यांनीच सकटाचे घाव झेलून मुंबईचे व त्यातील शाकाहारी व्यापार मंडळाचे रक्षण केले आहे. आम्ही मराठी म्हणून ते ‘मराठी दांडियाचा खेळ करत बसले नाहीत, तर हिंदू म्हणून हातात शस्त्र घेऊन क्षत्रिय धर्मास जागले, आज मुंबईचा ताबा घेण्याचे मनसुबे जे रचत आहेत त्यानी मुंबईसाठी काय केले, याचा हिशोब द्यावा. शिवसेना शिल्लक आहे म्हणून महाठी शिल्लक आहे. हिंदुत्व बचावले आहे, असे या अग्रलेखात म्हटले आहे.

ठाकरेंच्या ‘घरातला’ माणूस मुख्यमंत्र्यांनी फोडला, बाळासाहेबांचे सहाय्यक थापा शिंदे गटात
कमळाबाईच्या मराठी दांडियाने शिवसेनेच्या व्होटबँकेला धक्का लागणार नाही

या अग्रलेखात शिवसेनेकडून भाजपकडून यंदाच्या नवरात्रौत्सवात मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ‘मराठी दांडिया’ कार्यक्रमावरही टीकास्त्र सोडले आहे. मराठी दांडियाचे आयोजन करुन भाजपने मराठी मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न चालवला आहे. असे दांडिये घुमवून मराठी माणसांची एकजूट फोडता येईल, हा त्यांचा भ्रम आहे. मुंबईतील मराठी आणि अमराठी म्हणजेच ‘मुंबैकर’ सातत्याने शिवसेनेच्या पाठिशी उभा राहिला आहे. शिवसेनाप्रमुखांनी केलेली ही रचना आजही मजबूत पायावर उभी आहे. ती कमळाबाईच्या मराठी दांडियाने टीचभरही हलणार नाही, असे ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here