Maharashtra Politics | या दोन घटनांमुळे शिंदे-फडणवीस सरकारची प्रतिमा मलीन झाली होती. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर पवित्रा घेतल्याचे दिसत आहे. त्यांनी कालच्या बैठकीत आपल्या गटाच्या सर्व नेत्यांना कोणतेही वादग्रस्त वक्तव्य किंवा न्यायप्रविष्ट विषयांवर न बोलण्याची तंबी दिली आहे. त्यामुळे आता शिंदे गटाचे आमदार मुख्यमंत्र्यांच्या या सूचनेचे पालन करणार का, हे पाहावे लागेल.

 

CM Eknath Shinde angry
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

हायलाइट्स:

  • मुख्यमंत्र्यांनी नेते आणि मंत्र्यांना चांगलेच झापल्याची माहिती समोर आली आहे
  • पक्ष चिन्हाबाबत विनाकारण भाष्य करु नका
मुंबई: गेल्या काही दिवसांमध्ये शिंदे गटातील नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे शिंदे-फडणवीस सरकार सातत्याने कोंडीत सापडताना दिसत आहे. अतिउत्साह, बेभान होऊन बोलणे आणि चमकोगिरीच्या नादात शिंदे गटाचे नेते हे सातत्याने ‘सेल्फ गोल’ करताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बुधवारी झालेल्या बैठकीत आपल्या गटातील वाचाळवीर नेते आणि मंत्र्यांना चांगलेच झापल्याची माहिती समोर आली आहे. मी बोलत नाही तरी तुम्ही का एवढं बोलता? असा सवालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी वाचाळवीर मंत्री आणि आमदारांना विचारला. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आमदारांचे मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत कान टोचले आहेत. पक्ष चिन्हाबाबत विनाकारण भाष्य करु नका. वादग्रस्त वक्तव्य करु नका, अशा सूचनाही एकनाथ शिंदे यांनी आमदार आणि मंत्र्यांना दिल्या आहेत.
Tanaji Sawant: मराठा आरक्षणाबाबत वादग्रस्त वक्तव्य, मराठा क्रांती मोर्चाचा तानाजी सावंतांना निर्वाणीचा इशारा
अलीकडच्या काळात शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार, आमदार प्रकाश सुर्वे, मंत्री तानाजी सावंत, संतोष बांगर यांच्या वक्तव्यांमुळे शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठताना दिसली होती. काही दिवसांपूर्वीच मराठा आरक्षणाबाबत बोलताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची जीभ घसरली होती. त्यावरून प्रचंड वादंग निर्माण झाला होता. अखेर ताानाजी सावंत यांना मराठा समाजाची जाहीर माफी मागावी लागली होती. याशिवाय, पावसाळी अधिवेशनात विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना उडालेली भंबेरी आणि हाफकिन इन्स्टिट्यूटबाबतच्या ‘अगम्य’ वक्तव्यामुळे तानाजी सावंत यांच्या लौकिकात आणखीनच भर पडली होती. तर दुसरीकडे मंत्री अब्दुल सत्तार यांनी पंतप्रधान कृषी सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्यातही नवी योजना आणली जाणार असल्याची घोषणा परस्पर करून टाकली होती. यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वांदेखत अब्दुल सत्तार यांची हजेरी घेतली होती.
सत्तार म्हणाले, ‘एक मारली तर चार मारा’, ही आपली संस्कृती नव्हे, वरिष्ठांनी वेळीच कान टोचावे : अजित पवार
याशिवाय, काही दिवसांपूर्वी मुंबईतील शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे हात-पाय तोडण्याची भाषा केली होती. तर हिंगोलीतील आमदार संतोष बांगर यांनी सरकारी अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली होती. या दोन घटनांमुळे शिंदे-फडणवीस सरकारची प्रतिमा मलीन झाली होती. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर पवित्रा घेतल्याचे दिसत आहे. त्यांनी कालच्या बैठकीत आपल्या गटाच्या सर्व नेत्यांना कोणतेही वादग्रस्त वक्तव्य किंवा न्यायप्रविष्ट विषयांवर न बोलण्याची तंबी दिली आहे. त्यामुळे आता शिंदे गटाचे आमदार मुख्यमंत्र्यांच्या या सूचनेचे पालन करणार का, हे पाहावे लागेल.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here