Eknath Shinde camp MLA’s | बाळासाहेब ठाकरेंची सावली असलेले चंपासिंह थापा यांनी शिंदे गटाला पाठिंबा दर्शविला आहे. या प्रश्नावर प्रतिक्रिया विचारली असता ‘मी अजून बघितलंच नाही’ अशी आश्चर्यकारक प्रतिक्रिया सावंत यांनी दिली. तर दसरा मेळाव्याबाबतच्या प्रश्नांवर बोलायलाही मंत्री सावंत यांनी टाळाटाळ केली. “दसऱ्याला फक्त बाळासाहेब ठाकरे यांचाच मेळावा होणार” असे उत्तर देत त्यांनी विषय संपविण्याचा प्रयत्न केला.
हायलाइट्स:
- एकनाथ शिंदेंनी आपल्याच नेत्यांना झापलं
- तानाजी सावंत यांनी या विषयातून अंग काढून घेण्याचा प्रयत्न केला
बाळासाहेब ठाकरेंची सावली असलेले चंपासिंह थापा यांनी शिंदे गटाला पाठिंबा दर्शविला आहे. या प्रश्नावर प्रतिक्रिया विचारली असता ‘मी अजून बघितलंच नाही’ अशी आश्चर्यकारक प्रतिक्रिया सावंत यांनी दिली. तर दसरा मेळाव्याबाबतच्या प्रश्नांवर बोलायलाही मंत्री सावंत यांनी टाळाटाळ केली. “दसऱ्याला फक्त बाळासाहेब ठाकरे यांचाच मेळावा होणार” असे उत्तर देत त्यांनी विषय संपविण्याचा प्रयत्न केला. अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या पक्षप्रमुखपदी निवड करणारा ठराव केल्याचा गौप्यस्फोट केला होता. यावरही मला काहीच माहीत नाही, असे सांगत तानाजी सावंत यांनी या विषयातून अंग काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वरिष्ठांनी तानाजी सावंत यांना ‘सक्तीचे मौन’ बाळगण्याचे आदेश दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
काही दिवसांपूर्वीच मराठा आरक्षणाबाबत बोलताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची जीभ घसरली होती. त्यावरून प्रचंड वादंग निर्माण झाला होता. अखेर ताानाजी सावंत यांना मराठा समाजाची जाहीर माफी मागावी लागली होती. याशिवाय, पावसाळी अधिवेशनात विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना उडालेली भंबेरी आणि हाफकिन इन्स्टिट्यूटबाबतच्या अगम्य वक्तव्यामुळे तानाजी सावंत यांच्या लौकिकात आणखीनच भर पडली होती. या सगळ्यामुळे तानाजी सावंत अलीकडच्या काळात सातत्याने चर्चेत आहेत.
वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आपल्याच नेत्यांमुळे एकनाथ शिंदे वैतागले
गेल्या काही दिवसांमध्ये शिंदे गटातील नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे शिंदे-फडणवीस सरकार सातत्याने कोंडीत सापडताना दिसत आहे. अतिउत्साह, बेभान होऊन बोलणे आणि चमकोगिरीच्या नादात शिंदे गटाचे नेते हे सातत्याने ‘सेल्फ गोल’ करताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बुधवारी झालेल्या बैठकीत आपल्या गटातील वाचाळवीर नेते आणि मंत्र्यांना चांगलेच झापल्याची माहिती समोर आली आहे. मी बोलत नाही तरी तुम्ही का एवढं बोलता? असा सवालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी वाचाळवीर मंत्री आणि आमदारांना विचारला. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आमदारांचे मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत कान टोचले आहेत. पक्ष चिन्हाबाबत विनाकारण भाष्य करु नका. वादग्रस्त वक्तव्य करु नका, अशा सूचनाही एकनाथ शिंदे यांनी आमदार आणि मंत्र्यांना दिल्या आहेत.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.