Maharashtra Politics | एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात खूप आकांडतांडव घातले होते. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची समजूत काढली होती. भाजपचा त्रास कसा असतो, हे उघडपणे सांगणारे तेव्हा एकनाथ शिंदे हेच होते. पण आता ते भाजपच्या इतक्या जवळ कसे गेले, याचे उत्तर फक्त सक्तवसुली संचलनालयाचे संचालकच सांगू शकतात.

 

Uddhav Thackeray Eknath Shinde
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे

हायलाइट्स:

  • राऊतांनी २०१४ सालचा राजकीय घटनापट मांडला
  • एकनाथ शिंदे यांनीच भाजपची साथ सोडा, असा आग्रह धरला होता
मुंबई: युती सरकारच्या काळात भाजपच्या त्रासाला कंटाळून सर्वप्रथम आवाज उठवणारे शिवसेनेतील मंत्री हे एकनाथ शिंदे हेच होते. पण आता ते भाजपच्या (BJP0 इतक्या जवळ कसे गेले आहेत, हे फक्त ईडीचे (ED) डायरेक्टरच सांगू शकतात, अशी खोचक टिप्पणी शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केली आहे. विनायक राऊत यांनी गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत असताना २०१४ सालचा राजकीय घटनापट मांडला. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबाबतचा एक किस्सा सांगितला. (Shivsena MP Vinayak Raut slams CM Eknath Shinde)
Sharad Pawar: शरद पवारांनी महाराष्ट्राचा एक दौरा केल्यावर ते लगेच सत्तेवर येतात: सुप्रिया सुळे
एकनाथ शिंदे यांनीच भाजपची साथ सोडा, असा आग्रह धरला होता. मी त्यांच्या मंत्रिमंडळात राहू शकत नाही, असे त्यांनी म्हटले होते. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात खूप आकांडतांडव घातले होते. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची समजूत काढली होती. भाजपचा त्रास कसा असतो, हे उघडपणे सांगणारे तेव्हा एकनाथ शिंदे हेच होते. पण आता ते भाजपच्या इतक्या जवळ कसे गेले, याचे उत्तर फक्त सक्तवसुली संचलनालयाचे संचालकच सांगू शकतात, असे विनायक राऊत यांनी सांगितले. त्यामुळे आता या टीकेला एकनाथ शिंदे गटाकडून कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
मित्रासाठी कायपण! उद्धव ठाकरे पुन्हा दाखवणार तोच पॅटर्न? दसरा मेळाव्याकडे सगळ्यांचं लक्ष

एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या भूमिकेवर शंका

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत नुकताच एक गौप्यस्फोट केला होता. २०१४ मध्ये शिवसेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत येण्याची तयारी दर्शवली होती, असे त्यांनी सांगितले. सत्ता स्थापनेसाठी २०१४ मध्येच शिवसेनेकडून काँग्रेसकडे प्रस्ताव आला होता. विशेष म्हणजे त्यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळात एकनाथ शिंदेही होते. आणि प्रस्तावाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करण्यास त्यावेळी सुचवलं होतं. त्यांची संमती असेल तर आमच्या पक्षातर्फे तुमच्या प्रस्तावाचा विचार करू, असा दावा अशोक चव्हाण यांनी केला होता.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here