Maharashtra Politics | एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात खूप आकांडतांडव घातले होते. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची समजूत काढली होती. भाजपचा त्रास कसा असतो, हे उघडपणे सांगणारे तेव्हा एकनाथ शिंदे हेच होते. पण आता ते भाजपच्या इतक्या जवळ कसे गेले, याचे उत्तर फक्त सक्तवसुली संचलनालयाचे संचालकच सांगू शकतात.

हायलाइट्स:
- राऊतांनी २०१४ सालचा राजकीय घटनापट मांडला
- एकनाथ शिंदे यांनीच भाजपची साथ सोडा, असा आग्रह धरला होता
एकनाथ शिंदे यांनीच भाजपची साथ सोडा, असा आग्रह धरला होता. मी त्यांच्या मंत्रिमंडळात राहू शकत नाही, असे त्यांनी म्हटले होते. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात खूप आकांडतांडव घातले होते. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची समजूत काढली होती. भाजपचा त्रास कसा असतो, हे उघडपणे सांगणारे तेव्हा एकनाथ शिंदे हेच होते. पण आता ते भाजपच्या इतक्या जवळ कसे गेले, याचे उत्तर फक्त सक्तवसुली संचलनालयाचे संचालकच सांगू शकतात, असे विनायक राऊत यांनी सांगितले. त्यामुळे आता या टीकेला एकनाथ शिंदे गटाकडून कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या भूमिकेवर शंका
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत नुकताच एक गौप्यस्फोट केला होता. २०१४ मध्ये शिवसेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत येण्याची तयारी दर्शवली होती, असे त्यांनी सांगितले. सत्ता स्थापनेसाठी २०१४ मध्येच शिवसेनेकडून काँग्रेसकडे प्रस्ताव आला होता. विशेष म्हणजे त्यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळात एकनाथ शिंदेही होते. आणि प्रस्तावाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करण्यास त्यावेळी सुचवलं होतं. त्यांची संमती असेल तर आमच्या पक्षातर्फे तुमच्या प्रस्तावाचा विचार करू, असा दावा अशोक चव्हाण यांनी केला होता.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.