भगतसिंह कोश्यारी यांनी गुरुवारी नागपूरमधील सुरेश भट सभागृहात आयोजित भारत विकास परिषदेला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. भारत विकास परिषदेत देशभरातील चांगले लोक आहेत. जो चांगला वकील आहे, चांगला डॉक्टर, चांगला दुकानदार असे सर्व लोक एकत्र बसतात, योजना तयार करतात. तसेच योजना करून देशभरात सेवेचं काम करतात. आपण ते काम किती पुढे नेऊ शकतो यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे मत भगतसिंह कोश्यारी यांनी मांडले. आपण जेव्हा कुटुंबाविषयी विचार करतो की, मुलाला आयएएस बनवायचं आहे, सध्या दोन कारखाने आहेत, तर १० कारखाने असावेत. जेव्हा आपण अशी इच्छा बाळगतो तेव्हा कारखानाही तयार होतो आणि मुलगा आयएएसही बनतो, असेही कोश्यारी यांनी म्हटले.
मला निवृत्ती मिळायला हवी तरीही…, राज्यपाल कोश्यारींनी मनातलं बोलून दाखवलं
गडकरी म्हणतात, मला आठ हजार रुपये द्या!
यावेळी भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा एक किस्सा सांगितला. गडकरी मला नेहमी म्हणतात की, कोश्यारीजी तुम्ही मला ८ हजार रुपये द्या. मी तुम्हाला ८ लाख कोटी रुपयांची कामे करुन दाखवतो, हाच उत्कर्ष आहे. हाच विकास आहे. विकासाची कामं करायची असतील, तर त्यासाठी एक आपल्यात तशी इच्छाशक्ती असायला हवी, असे भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले.