‘…म्हणून मुंडे राष्ट्रवादीत येणार नाहीत’
रक्ताची नाते कधी संपत नसतात, असे मत भाजपनेत्या पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्याबाबत व्यक्त केले होते. यावर बोलताना खडसे म्हणाले की, ‘पंकजा मुंडे यांनी काही तरी वक्तव्य केले म्हणून सुतावरून स्वर्ग गाठण्याची गरज नाही. राजकारणात नाते जोपासले पाहिजे. यातूनच ओघवत्या शब्दात पंकजा मुंडे या बोलल्या असाव्यात.’
चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले?
पुण्यातील एसएनडीटी विद्यापीठात चंद्रकांत पाटील यांनी भाषणादरम्यान एक वक्तव्य केलं. पुढील शंभर वर्षांची दृष्टी आपल्याकडे नाही, आणि आपल्याला त्यात रसही नाही. कारण आपल्याला अजून ५-१० वर्ष काम करुन जायचंय, असं पाटील बोलण्याच्या ओघात म्हणाले. परंतु त्यावरुन चंद्रकांत पाटलांना निवृत्तीचे वेध लागल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यापूर्वीही चंद्रकांत पाटील यांचे एक वक्तव्य प्रचंड गाजले होते. मी कोणतीच निवडणूक आजपर्यंत हरलेलो नाही. कोल्हापूरमधून आजही लढण्यास तयार आहे आणि तिथून निवडून आलो नाही तर राजकारण सोडून हिमालयात जाईन, असे आव्हानात्मक उद्गार नोव्हेंबर २०२० मध्ये काढल्याने चंद्रकांत पाटील चर्चेत आले होते. त्यावरुन अनेकदा विरोधक त्यांना आजही डिवचतात.