Mumbai News Today: वर्ग चालू असताना इतरांशी बोलत असल्याचे वाटून शिक्षकाने नववीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांच्या कानशिलात लगावल्याची घटना सांताक्रूझ येथील पोतदार विद्यालयात घडली.

मुख्याध्यापकांनी घटनेची गंभीर दखल घेत दोन शिक्षकांसोबत नीरजला खार येथील रामकृष्ण मिशन रुग्णालयात पाठविले. कानाचे डॉक्टर नसल्याने इतर डॉक्टरांनी तपासून तात्पुरते औषध दिले. दुसऱ्या दिवशी नीरज शाळेत गेल्यानंतर दोन शिक्षकांनी त्याला कानाच्या डॉक्टरांकडे नेले. या डॉक्टरांनी नीरजला तपासले असता मारहाणीमुळे त्याच्या कानाचा पडदा फाटला गेल्याचे सांगितले. शिक्षकाच्या मारहाणीमुळे मुलाचा कान निकामी झाल्यामुळे संतप्त झालेल्या नीरजच्या पालकांनी कमलेश तिवारी याच्याविरोधात सांताक्रूझ पोलिस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीवरून पोलिसांनी तिवारी याच्याविरोधात भादंवि कलम ३२५ (दुखापत) आणि लहान मुलांची काळजी व संरक्षण कायदाच्या कलम ७५अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.