जालना : सोयाबीनची मळणी करत असताना मळणी यंत्रात पडून ३३ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. संदीप सुधाकर गाढे (रा. बाभुळगाव, तालुका भोकरदन) असं या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील बाभुळगाव येथील तरुण संदीप गाढे हे शेतामध्ये सोयाबीनची मळणी करत होते. मात्र कामाच्या गडबडीत असतानाच ते मळणी यंत्रात पडले. या दुर्घटनेत गंभीररित्या जखमी झालेल्या संदीप यांचा जागीच मृत्यू झाला.

शिंदे गटातील आमदार फडणवीसांसोबत मेळाव्याला, गळ्यात भाजपचा गमछा

या घटनेची माहिती भोकरदन पोलिसांना मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह मळणी यंत्रातून बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला.

दरम्यान, या घटनेमुळे बाभुळगाव परिसरात शोककळा पसरली आहे. सध्या सोयाबीन मळणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. शेतकऱ्यांनी सावधानता बाळगत मळणी यंत्रावर काम करावे. तसंच अनुभवी सहायकाशिवाय मळणी यंत्र चालू करू नये व सावधानता बाळगावी, असं आवाहन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here