कानपूर: उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये सहा मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. मंगळवारी ही घटना घडली. बिल्हौरच्या गंगा घाटावर ही घटना घडली. बुडालेल्या मुलांचा शोध अनेक तास सुरू होता. जिल्हा प्रशासन, एसडीआरएफ आणि पाणबुड्यांच्या पथकानं सर्च ऑपरेशन राबवलं.

सहा मुलांचा शेवटचा फोटो समोर आला आहे. घटना घडण्याच्या काही मिनिटांपूर्वी हा फोटो काढण्यात आला. हा फोटो काढल्यानंतर पुढच्या काही मिनिटांत एक मुलगी बुडू लागली. तिला वाचवण्याच्या प्रयत्नात सगळेच बुडाले. मुलीला वाचवण्यासाठी एकापाठोपाठ एक ५ मुलांना पाण्यात उड्या घेतल्या. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत बुडालेल्या मुलांचा शोध घेण्यात आला. बुधवारी सकाळीदेखील शोधकार्य सुरू होतं.
सासरच्यांना बोलावू नका! अधिकाऱ्यांना सांगा, साप चावला!! हवाई दलाच्या जवानानं जीवन संपवलं
सौरव कटियारच्या काकांच्या दुकानाचं उद्घाटन होतं. त्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सर्व नातेवाईकांची मुलं आली होती. त्यात अनुष्का, तनू, मनू, अंशिका, अभय आणि सौरभ यांचा समावेश होता. मंगळवारी दुपारी गंगा नदी पात्रात उभे राहून सगळ्यांनी एक फोटो काढला. त्यांचा फोटो गौरीनं काढला होता.

फोटो काढत असताना अंशिका बुडू लागली. तिला वाचवण्यासाठी सगळ्यांनी एकापाठोपाठ एक उड्या घेतल्या. मात्र सगळेच बुडाले. बुडालेले सर्वजण एकमेकांचे नातेवाईक होते. मुलं बुडाल्याचं समजताच कुटुंबीयांना धक्का बसला. संध्याकाळी एसडीआरएफचं पथक पोहोचलं. तेव्हापर्यंत केवळ सौरभचा मृतदेह हाती लागला होता. इतरांच्या शोधासाठी बुधवारी सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं.
बटण दाबलं, दार उघडलं, पण लिफ्ट आली नाही; ११ व्या मजल्यावरून पडून तरुणाचा करुण अंत
बिल्होर घाटासोबतच इतर घाटांवरही मुलांचा शोध घेण्यात आला. पाण्याचा वेग जास्त असल्यानं मुलं दूरपर्यंत वाहून गेल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एसडीआरएफ, पोलीस आणि पाणबुड्यांनी मुलांचा शोध सुरू ठेवला. एकाचवेळी ६ मुलं बुडाल्याची बातमी पसरताच परिसरात खळबळ माजली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here