गुन्हेगाराची शिक्षा संपूर्ण समाजाला नको
एखाद्या वाईट व्यक्तीच्या गुन्ह्यांमुळे संपूर्ण समाजाला त्यासाठी दोषी ठरवणं आणि त्यांना लक्ष्य करणं योग्य नाही. यामुळे कानपूर पोलीस हत्याकांडातील गुन्हेगार विकास दुबे आणि त्याच्या साथीदारांवरून समाजात जी भीती आणि दहशत आहे ती दूर केली पाहिजे, असं मायावती म्हणाल्या.
ब्राह्मण समाजात असुरक्षिततेची भावना
विकास दुबे एन्काउंटरवरून यूपी सरकारने राजकारण करण्याऐवजी या प्रकरणी जनतेत विश्वास निर्माण केला पाहिजे. ब्राह्मण समाजात भीती, दहशत आणि असुरक्षितता वाढेल असं कुठलंही काम सरकारने करू नये, असं मायावतींनी लिहिलंय.
योगी सरकारला टोला
यूपीतील गुन्हेगारांविरोधात मोहीम उघडून त्याच्या आडून दलित, मागासवर्गीय आणि मुस्लिम समाजाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न होतोय. ही कारवाई राजकीय हेतुने प्रेरीत दिसून येतेय. अशा प्रकरणांमध्ये सरकारने निष्पक्ष आणि इमानदार असले पाहिजे, तरच राज्य गुन्हेगारांपासून मुक्त होईल, असा टोला मायावतींनी योगी सरकारला लगावला.
एन्काउंटरमध्ये मारला गेला विकास दुबे
कानपूरमधील ८ पोलिसांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबे हा पोलीस एन्काउंटरमध्ये मारला गेला. पोलिसांच्या हत्येनंतर विकास दुबे हा पळाला होता. मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये त्याला अटक करण्यात आली. विकास दुबेला घेऊन यूपी एसटीएफचा ताफा कानपूरला निघाला होता. सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पावसामुळे पोलिसांची गाडी पलटली. यात विकास दुबेसह पोलील जखमी झाले. यावेळी विकास दुबेने पोलिसांची पिस्तुल हिसकावून पळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी विकास दुबेला शरण येण्याचे आवाहन केलं. पण त्याने ऐकले आणि त्यानंतर झालेल्या चकमकीत विकास दुबे ठार झाला. त्याला कानपूरमध्ये हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. शुक्रवारी हे एन्काउंटर झालं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times