मुंबईः दिवसेंदिवस मुंबईसह राज्यात करोनाचा प्रसार वाढतोच आहे. करोनाचा प्रसार कमी करण्यासाठी राज्य सरकारसह आरोग्य यंत्रणेनंही कंबर कसली आहे. मात्र, असं असतानाच एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मुंबईतील करोना प्रादुर्भाव अटोक्यात येत असल्याचं चित्र आहे. राज्याच्या राज्याच्या नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांनी फेसबुक पोस्टच्याद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव जरी वाढत असला तरी मुंबईत मात्र करोनाचा आलेख घटत असल्याचं चित्र आहे. महापालिकेने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे मुंबईतील करोनाचा आलेख झपाट्याने खाली येत असल्याची माहिती आहे. संपूर्ण मुंबईत रुग्णवाढीचा वेग १.३९ टक्क्यांपर्यंत खाली आला असून, रुग्ण दुपटीचा कालावधी ५० दिवस इतका झाला आहे. वांद्रे परिसरात हा कालावधी तब्बल १४० दिवसांवर पोहोचला असून, डोंगरी, कुर्ला, माटुंगा या भागात ७९ ते ९८ दिवसांपर्यंत वाढला आहे.

रुग्ण संख्या आटोक्यात येणे हा ‘मुंबई पॅटर्न’ असल्याचे म्हटले आहे. हा पॅटर्न आता देशभरात नावाजला जात असून, यामागे पालिकेने राबवलेले ‘चेस द व्हायरस’ हे धोरण परिणामकारक ठरल्याचे त्यांनी फेसबुकवरील पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे. हे यश विविध आघाड्यांवर लढणाऱ्या प्रत्येक पालिका कर्मचाऱ्यांचे असल्याचे म्हैसकर म्हणाल्या. म्हैसकर यांनी करोनाची लस येईपर्यंत मुंबईकरांनी ‘न्यू नॉर्मल’ जीवनशैली आत्मसात करताना, प्राप्त परिस्थितीसोबत जगण्यास सुरुवात करावी, असे आवाहन केले आहे. न्यू नॉर्मल म्हणजे काय तर, कुठल्याही अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडून करोनाला निमंत्रण देणे खरंच गरजेचे आहे काय, हे स्वतःला विचारणे. हा संसर्ग टाळण्यासाठी बुफे जेवण करणे, जिममध्ये जाणे, मनोरंजन उद्यानात जाणे, चित्रपटगृह किंवा बारमध्ये जाणे, संगीत मैफल किंवा क्रीडांगणात जाणे, गर्दी असलेले धार्मिक कार्यक्रमात उपस्थिती लावणे अशा सर्वाधिक धोका असलेल्या ठिकाणी या काळात न जाण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. हे लक्षात ठेवण्यासाठी गर्दीची ठिकाणे आणि जवळून संपर्क येईल अशी ठिकाणे, बंदिस्त जागा टाळण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here