नाशिकमध्ये बसचा भीषण अपघात

नाशिक : औरंगाबादमध्ये आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. मिरची चौकात खासगी बसचा अपघात झाल्यानंतर बसने अचानक पेट घेतला. या भीषण अपघाताने तब्बल ११ जणांचा जीव घेतला तर अनेक जण गंभीर जखमी आहेत. या अपघाताचे काही फोटो आमच्या हाती आले आहेत.
११ जणांचा होरपळून मृत्यू

ही आग इतकी भयंकर होती की यामध्ये संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. तर या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे.(Nashik Bus Fire)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

महापौर घटनास्थळी आहेत. जिल्हाधिकारांशी बोललो. या अपघाताची चौकशी केली जाईल तर सध्या जखमींना मदत करण्यास प्राधान्य दिले आहे. सर्व उपचार शासनाच्या वतीने केला जाईल तर मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपये देण्यात येईल’ अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
पोलिस उपायुक्त अमोल तांबे यांनी या अपघाताची पुष्टी केली

नाशिक-औरंगाबाद मार्गावर नांदूरनाका या ठिकाणी हा भीषण अपघात घडला आहे. पोलिस उपायुक्त अमोल तांबे यांनी या अपघाताची पुष्टी केली आहे.
बस यवतमाळहून मुंबईकडे निघाली होती

ही बस यवतमाळहून मुंबईकडे निघाली होती. मात्र, वाटेतच बसला आग लागली. या आगीत दहा जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरू

शनिवारी पहाटे ४ वाजून २० मिनिटांनी हा अपघात झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलिसांचं पथक दाखल झालं आहे. तसंच, बचावकार्य सुरू असल्याचं म्हटलं जात आहे.
दहा मयत पुरुष असून २१ प्रवाशी जखमी

दहा मयत पुरुष असून २१ प्रवाशी जखमी आहे. यापैकी एकजण गंभीर जखमी आहे. त्यांना जिल्हा रुग्णालयातून दुसरीकडे पुढील उपचारांसाठी हालवण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी गंगाधरन डी यांनी दिली आहे.
प्रवाशाने सांगितला थरकाप उडवणारा प्रसंग

सकाळी झोपेत असताना गाडी दुसऱ्या गाडीला धडकली. काही समजण्यापूर्वीच आग लागली. मी खिडकीतून उडी मारत बाहेर निघाल्याने जीव वाचला. सोबत तीन लहान मुली होत्या. सुदैवाने त्यांचेही प्राण वाचले. अग्निशमन यंत्रणा वीस मिनिटांनी पोहोचली, अशी माहिती एका प्रवाशाने दिली आहे.