st bus news today marathi, MSRTC News : एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी पुरेसे पैसेच नाहीत, परिवहन महामंडळाने तोडगा काढला पण… – st does not have enough money to pay employees salaries so withhold the salaries of the administrative staff and officers on diwali
अहमदनगर : राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटी कर्मचाऱ्यांना पगार आणि इतर मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाला एक वर्ष पूर्ण होत असताना त्यांचे प्रश्न कायमस्वरूपी सुटलेले नसल्याचे समोर आले आहे. सरकारकडून पगारासाठी देण्यात येणाऱ्या निधीत कपात करण्यात आल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांचे पगार करण्यासाठी एसटीकडे पुरेसे पैसेच नाहीत. त्यामुळे चालक-वाहक आणि आगारातील कर्मचाऱ्यांचे पगार देण्यात आले असून प्रशासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे पगार मागे ठेवण्याचा तोडगा काढण्यात आला आहे. यावरून आता प्रशाकीय कर्मचाऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे.
एसटीचा संप आणि करोनानंतर सावरलेल्या परिस्थितीत एसटी सेवा पूर्वत सुरू झाली आहे. मात्र, अद्यापही आवश्यक तेवढे उत्पन्न एसटीला मिळत नाही. संप काळात उभ्या असल्याने अनेक गाड्या नादुरूस्त झाल्या आहेत. प्रवासी संख्या घटली आहे. त्याचा परिणाम उत्पन्नावर झाला आहे. कर्मचाऱ्यांच्या पागारासाठीही एसटीला सरकारकडून मिळणाऱ्या निधीवरच अवलंबून राहावे लागत आहे. अशा परिस्थितीत सध्या राज्य सरकारने या निधीला कात्री लावली आहे. त्यामुळे एसटीकडे कर्मचाऱ्यांचे पगार करण्याइतपत पैसेच नाहीत. Weather Alert : महाराष्ट्रावर ४८ तास अस्मानी संकट, मुंबईत यलो तर ‘या’ जिल्ह्यांना तुफान पावसाचा इशारा पगार थकल्यावर पुन्हा संप तसेच आत्महत्या असे प्रकार होऊ शकतात. त्यामुळे एसटीने यावर तोडगा काढत चालक-वाहक आणि आगारातील इतर तांत्रिक कर्मचाऱ्यांचे पगार दिले. मात्र, प्रशासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे पगार केले नाहीत. राज्यात अशा कर्मचाऱ्यांचीही संख्या मोठी आहे. त्यांना पगार केव्हा मिळणार, हे सांगितले जात नाही. ऐन दिवाळीच्या तोंडावर ही आर्थिक आणीबाणी ओढावल्याने या कर्मचारी वर्गात संताप आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आधीच्या महाविका आघाडी सरकारच्या काळातील अनेक निर्णय बदलेले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा संप झाला, तेव्हा भाजपकडून त्यांना पाठिंबा देण्यात आला होता. त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली होती. आता भाजप सत्तेवर आहे. एसटी कर्मचाऱ्यांबद्दल सहानुभूती दाखविताना संप काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्ला करणाऱ्या ११८ कर्मचाऱ्यांवरील बडतर्फीची कारवाईही या सरकारने मागे घेतली आहे. तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न पूर्णत: सुटलेला नाही. दिवाळी तोंडावर आली असल्याने लवकरात लवकर तो सोडविण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.