या आरोपांबाबत पत्रकारांनी विचारले असता विखे पाटील म्हणाले की, ‘केंद्र सरकारवर आरोप करण्यापलीकडे उद्धव ठाकरेंकडे काय शिल्लक आहे? त्यांनी जनाधार गमावला, सरकार गमवलं. आता स्वतःचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. राहिलेले थोडेफार जे काही संघटन आहे ते कसे टिकवता येईल त्याच्यावर लक्ष केंद्रित करावे. आतापर्यंत दुर्दैवाने त्यांना चुकीचे सल्लागार मिळाले होते. त्यांचे प्रवक्ते बेताल विधाने करत होते. सत्याचा विजय होतोच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दृष्टीने हा फार मोठा विजय आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा हा मोठा नैतिक पराभव आहे,’ असं विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, एकीकडे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटानेही चिन्हाची मागणी केली असताना आयोगाने चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतल्याने हा मुख्यमंत्री शिंदे यांच्यासाठी दिलासा कसा, असा प्रश्न आता विखे पाटील यांच्या वक्तव्यानंतर उपस्थित केला जाऊ लागला आहे.