Authored by दीपक पडकर | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Oct 9, 2022, 5:35 PM

Baramati News : दसऱ्याच्या मेळाव्याला ते म्हंटले की माणस स्वत:हून आली होती. मग खुर्च्या मोकळ्या का झाल्या, असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील शेतकरी मेळाव्यात आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार बोलत होते.

 

Baramati News
माझ्या सभेतून एक माणूस उठला नाही, कारण मी गद्दारी करुन आलो नाही : अजित पवार

हायलाइट्स:

  • सर्वसामान्यांसाठी काही केलेलं दिसेना
  • पण त्यासाठी आकडा पक्का लागला पाहिजे
  • १४५ आकडा गाठला पाहिजे
पुणे : सत्ताधारी मंडळी सर्वसामान्यांचे सरकार आहे, असं सांगत आहेत. परंतु त्यांनी सर्वसामान्यांसाठी काही केलेलं दिसेना. दसऱ्याच्या मेळाव्याला ते म्हटले की माणसं स्वत:हून आली होती. मग त्यांच्या भाषणात लोक खुर्च्या सोडून का गेले?, असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. माझ्या सोमेश्वरच्या सभेत शेवटच्या रांगेतील एकसुद्धा माणूस उठला नाही. कारण मी गद्दारी करुन आलेलो नाही, असं अजित पवार म्हणाले. नुकत्याच पार पडलेल्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा सुरु असताना काही शिंदे समर्थक सभेतून परत जात असताना दिसले. या घटनेचा संदर्भ देत अजित पवारांनी हे वक्तव्य केलं.

राज्यापुढे अनेक महत्त्वाचे प्रश्न असताना त्याविषयी कोणी बोलायला तयार नाही. राज्यात फक्त हे त्यांना आणि ते यांना गद्दार म्हणत आहेत. दोघांनी एकमेकांना गद्दार म्हटल्याने महाराष्ट्राचे प्रश्न सुटणार आहेत का? असा सवाल देखील पवारांनी केला. पवार यांच्या भाषणावेळी तुमच्याकडेच पुन्हा सत्तेची सूत्रे येतील, असं एका कार्यकर्त्याने म्हटले. त्याचा धागा पकडत पवार म्हणाले, अरे आम्ही येऊ, पण त्यासाठी आकडा पक्का लागला पाहिजे. १४५ आकडा गाठला पाहिजे. मी बहुमताच्या आकड्याविषयी बोलतोय, मटक्याच्या नव्हे, हे सांगायलाही पवार विसरले नाहीत. बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील शेतकरी मेळाव्यात अजितदादा बोलत होते.

IND vs SA : भारतीय गोलंदाजांवर पुन्हा एकदा नामुष्की, दक्षिण आफ्रिकेने उभारला धावांचा डोंगर
लोकशाहीचा राज्यात खेळ खंडोबा चालवला आहे. कुणी काही करतंय, कशीही माणसं फोडली जात आहेत. अजिबातच स्थिरता राहिलेली नाही. त्यात अधिकाऱ्यांचे मरण होत आहे. अधिकाऱ्यांना कळेना की सत्तेतला माणूस, तिथे किती दिवस बसेल. नेमकं कुणाचं ऐकायचं. अधिकाऱ्यांना वाटतेय की, सत्तेत असणाऱ्यांचे ऐकावे तर उद्या दुसरी मंडळी खुर्चीवर आली तर कसे व्हायचे? या सगळ्यात अधिकारी वर्गाची मोठी कसरत सुरु आहे. यातून विकासाला मोठी अडचण निर्माण होत आहे, असंही अजितदादा म्हणाले आहेत.

शिंदे – ठाकरेंच्या भांडणात भाजपला लाभ? धनुष्यबाण गोठवल्यानं कमळ फुलण्याची शक्यता

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here