Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by रोहित दीक्षित | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 10 Oct 2022, 3:45 pm

Maharashtra Politics | याठिकाणी भुमरे साहेब सुध्दा आलेले आहेत. मात्र, विरोधीपक्षनेते दानवे साहेब आणि भुमरे साहेब या दोघांना जावं लागले. आता स्वाभाविक आहे, की रोजगार हमीचं मंत्रिपद त्यांच्याकडे असल्यामुळे, जास्त वेळ कुठंही एका ठिकाणी बसता येणं शक्य नाही. मात्र, ते देखील याठिकाणी अभिष्टचिंतन करायला इथं आले. सत्तेत असलेले दानवे साहेब देखील आलेले आहेत. आणि विरोधीपक्षात असलेले दानवे साहेब सुद्धा आलेले आहेत.

 

Dhananjay Munde NCP
धनंजय मुंडे

हायलाइट्स:

  • शिवाजीदादा पंडित यांच्या ८५व्या अभिष्टचिंतन सोहळ्यात धनंजय मुंडेंची फटकेबाजी
  • दादांना हा महाराष्ट्र भीष्मपितामह का म्हणतो ?
बीड:“मी जेव्हा भाजपमध्ये होतो, तेव्हा मी भैय्यासाहेबांना ( अमरसिंह पंडितांना ) चकली देऊन भाजपमध्ये नेले ते आमदार झाले. त्यानंतर भैय्यासाहेबांनी (अमरसिंह पंडितांनी ) मला चकली देऊन राष्ट्रवादीत आणलं, मी आमदार झालो”….असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी भाजप-राष्ट्रवादीत येण्याजाण्याचा किस्सा सांगितला. तर यावेळी त्यांनी मंत्री रावसाहेब दानवे, विरोधीपक्षनेते अंबादास दानवे आणि मंत्री संदीपान भूमरे यांच्यावर मिश्कील टिप्पणी केली. ते बीडच्या गेवराईमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत आयोजित माजी मंत्री शिवाजीदादा पंडित यांच्या ८५व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त कार्यक्रमात बोलत होते. (Dhananjay Munde tell how they join NCP)

यावेळी धनजंय मुंडे यांनी म्हटले की मी अनेक मान्यवरांची भाषणं ऐकली, तशी ती वाचली होती. मात्र, आपण सगळ्यांनी ती ऐकली. तसं काही कुणाच्या भाषणांवर बोलायचं नाही, इथं सगळेच आलेले आहेत. म्हणजे सत्तेत असलेले दानवे साहेब देखील आलेले आहेत. आणि विरोधीपक्षात असलेले दानवे साहेब सुद्धा आलेले आहेत, म्हणजे हे दोघेही वनवे आहेत, अशी टिप्पणी धनंजय मुंडे यांनी केली.
धनंजय मुंडे म्हणाले, आमच्यातलं बहीण भावाचं नातं संपलं; पंकजा म्हणतात, ‘माझ्यासाठी…’
ते पुढे बोलताना म्हणाले की, याठिकाणी भुमरे साहेब सुध्दा आलेले आहेत. मात्र, विरोधीपक्षनेते दानवे साहेब आणि भुमरे साहेब या दोघांना जावं लागले. आता स्वाभाविक आहे, की रोजगार हमीचं मंत्रिपद त्यांच्याकडे असल्यामुळे, जास्त वेळ कुठंही एका ठिकाणी बसता येणं शक्य नाही. मात्र, ते देखील याठिकाणी अभिष्टचिंतन करायला इथं आले, असा चिमटा धनंजय मुंडे यांनी काढला. त्याचबरोबर सर्वांचे भाषण ऐकल्यानंतर माझ्या लक्षात आलं, कदाचित प्रत्येकांच्या कार्यालयातून दादांच्या बाबतीत एक वाक्यदेखील वेगळं लिहिलेलं नाही, तशाला तशी स्क्रिप्ट आहे, असेही धनंजय मुंडे म्हणाले. त्यांचा रोख कुणाकडे ?, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला.
राजकारणातील वंशवादावर पंकजा मुंडेंचं भाष्य, विधानसभेचा दाखला देत बंधू धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
तर माझ्या दृष्टीने शिवाजीदादांची खासियत काय ? माझ्या दृष्टीने दादांना हा महाराष्ट्र भीष्मपितामह का म्हणतो ?… तर एकदा का दादांनी टोपी कुणाच्या विरोधात काढली तर पुन्हा तो माणूस उठत नाही. दरम्यान दादांचे एक स्वप्न अधुरे आहे, ते आपण विजयराजेंना २०२४ च्या निवडणुकीत निवडून देऊन पूर्ण करु. तेव्हाच खऱ्या अर्थाने दादांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या शुभेच्छा ठरतील, असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here