16 Sheep died | या घटनेमध्ये १६ मेंढ्या मृत्युमुखी पडल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. या मेंढ्या मृत्युमुखी पडल्यानंतर परिसरात घबराट पसरली होती. आपल्याही दावणीला अनेक जनावरे आहेत, यांना तर अशा कोणत्या रोगाची लागण झाली नसेल ना, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये होती. मात्र, डॉक्टरांनी मेंढ्यांचे शवविच्छेदन केल्यानंतर विषारी औषध खाल्ल्यामुळे या मेंढ्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले.

 

Sheeps died
अंबाजोगाईत १६ शेळ्यांचा मृत्यू

हायलाइट्स:

  • औषध खाल्ल्यामुळे या मेंढ्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले
  • जनावरे एखाद्या मोकळ्या ठिकाणी चरण्यासाठी पाठवताना काळजी घ्या
बीड: अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदुर येथे दौंड रोड परिसरात सोमवारी काही मेंढ्या मृत अवस्थेत आढळून आल्या होत्या. यामध्ये जवळपास १६ मेंढ्या ह्या मृत्युमुखी पडल्या असून ३२ मेंढ्या या गुंगीच्या अवस्थेत असलेल्या आढळून आल्या. मात्र, या मेंढ्या मेल्या का या काल दिवसभर उघड झालं नव्हते. याठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी आणि डॉक्टरांनी येऊन याची पाहणी केल्यानंतर याचं खरं कारण समोर आले आहे. घाटनांदुर येथील घटनेने जवळपास बीड जिल्ह्यात खळबळ माजली होती.
शेतकरी हवालदिल; टोमॅटोला कवडीमोल भाव, संतप्त शेतकऱ्याने उभ्या पिकांमध्ये मेंढ्या सोडल्या
अचानक मेलेल्या या मेंढ्या नेमकं कशामुळे मेल्या असाव्यात याचा अंदाज लागत नव्हता. मात्र, जनावरांवर आलेले विविध रोग यामुळे तर या मेंढ्यांचा मृत्यू झाला नसावा का, असाही अंदाज अनेक शेतकरी व्यक्त करत होते. मात्र, ज्यावेळेस या मेंढ्यांची शवविच्छेदन करून डॉक्टरांनी विषारी औषध खाल्ल्याने हा प्रकार घडल्याचे स्पष्ट केले आहे.

भरधाव वाहनाने मेंढ्यांच्या अख्ख्या कळपाला चिरडलं; १४ मेंढ्या जागीच ठार, शेतकऱ्याचा प्रचंड आक्रोश
या घटनेमध्ये १६ मेंढ्या मृत्युमुखी पडल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. या मेंढ्या मृत्युमुखी पडल्यानंतर परिसरात घबराट पसरली होती. आपल्याही दावणीला अनेक जनावरे आहेत, यांना तर अशा कोणत्या रोगाची लागण झाली नसेल ना, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये होती. मात्र, डॉक्टरांनी मेंढ्यांचे शवविच्छेदन केल्यानंतर विषारी औषध खाल्ल्यामुळे या मेंढ्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. दरम्यान, डॉक्टरांनी शेतकऱ्यांना आव्हान केले आहे की, आपण आपले जनावरे एखाद्या मोकळ्या ठिकाणी चरण्यासाठी पाठवत असाल तर संबंधित ठिकाणी विषारी औषध टाकलेले नसेल, याची खात्री करुन घ्यावी. या घटनेनंतर जिल्हाभरात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मेंढ्यांच्या मृत्यूसाठी आर्थिक भरपाई या शेतकऱ्याला मिळावी अशी मागणी देखील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here