Beed Rain news: गेल्या पंधरा दिवसांपासून परतीच्या पावसाने बीड जिल्ह्यात उच्छाद मांडला आहे. अनेक पिकं मुसळधार पावसामुळे मातीमोल झाली आहेत. त्यातच परतीचा पाऊस काही ठिकाणी जीवघेणा ठरत आहे.

शेतात कांदा लागवड करत असताना सीमाच्या अंगावर वीज कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. सीमा पवार इयत्ता आठवीच्या वर्गामध्ये दयानंद माध्यमिक विद्यालय देवळा येथे शिक्षण घेत होती. सीमा अभ्यासात अतिशय हुशार होती. तिच्या अकाली निधनानं कुटुंबासह गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. बीड जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसापासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्यानं अनेक शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.