पोटदुखीची समस्या तशी सामान्य आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अनेकदा पोटदुखीची समस्या निर्माण होते. समस्या वाढल्यावर अनेकजण डॉक्टरांकडे जातात. बिहारमध्ये नुकताच असा एक प्रकार समोर आला.

अकरा डॉक्टरांच्या पथकानं शस्त्रक्रिया करून ग्लास बाहेर काढला. डॉक्टरांनी केलेली शस्त्रक्रिया यशस्वी ठरली. तरुणाच्या शरीरातून ग्लास काढण्यासाठी कोलोस्टॉमी करण्यात आली. कोलोस्टॉमीमध्ये आतड्याला एक छिद्र केलं जातं आणि एक बॅग फिट केली जाते. त्यामुळे जखम बरी होते. काही दिवसांत तरुणाला डिस्चार्ज मिळेल. जानेवारीत कोलोस्टॉमी काढली जाईल. तरुण नशेच्या धुंदीत असताना शरीरात ग्लास टाकण्यात आला असावा आणि त्यामुळेच तरुणाला काही आठवत नसावं, असा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला.
मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यातील एका व्यक्तीसोबतही असाच प्रकार घडला होता. बऱ्याच कालावधीपासून त्याच्या पोटात दुखत होतं. वेदना वाढू लागल्यानंतर त्यानं रुग्णालय गाठलं. डॉक्टरांनी रक्ताच्या चाचण्या, अल्ट्रासाऊंड आणि एक्सरे करण्यास सांगितलं. अहवाल पाहून डॉक्टरांना धक्का बसला. या व्यक्तीच्या मुत्राशयात खिळा अडकला होता. त्यामुळे त्याला अतीव वेदना सुरू होत्या. मुत्राशयात जवळपास वर्षभरापासून खिळा अडकला होता.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.