Maharashtra Politics | अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटाने उमेदवारी दिली आहे त्याला साम-दाम-दंड-भेद वापरुन पळवायचा प्रयत्न सुरु आहे. ही महाराष्ट्रातील जनतेला आवडणारी गोष्ट नाही. अंधेरीत (Andheri east by-election) मराठी भाषिकांची संख्या मर्यादित आहे. त्यामुळे तिथला निकाल काय येतो, याचं सर्वांनाच औत्सुक्य होतं. पण आता ठाकरे गटाचा तिथला उमेदवारच पळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

 

Jayant Patil Uddhav
जयंत पाटील आणि उद्धव ठाकरे

हायलाइट्स:

  • शिवसेनेतील बंडाळी भाजपप्रणित होती
  • ही महाराष्ट्रातील जनतेला आवडणारी गोष्ट नाही
मुंबई: अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीमुळे सध्या मुंबईतील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने मशाल हे चिन्ह दिल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जोमाने कामाला लागली होती. मात्र, आता शिंदे गटाकडून ठाकरे गटाच्या उमेदवार असलेल्या ऋतुजा लटके यांनाच गळाला लावण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या गोटातील चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे.
ठाकरे साहेब, डोंट वरी, लटके वहिनींना ५० हजारांनी निवडून आणू, काँग्रेसचा शब्द
अंधेरी पोटनिवडणुकीतील ठाकरे गटाचा उमेदवार शिंदे गटाने पळवणे, ही योग्य बाब आहे का? भाजप पक्ष सत्तेविना राहू शकत नाही. त्यामुळेच भाजपने शिवसेना पक्ष फोडला. शिवसेनेतील बंडाळी भाजपप्रणित होती. आता अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटाने उमेदवारी दिली आहे त्याला साम-दाम-दंड-भेद वापरुन पळवायचा प्रयत्न सुरु आहे. ही महाराष्ट्रातील जनतेला आवडणारी गोष्ट नाही. अंधेरीत मराठी भाषिकांची संख्या मर्यादित आहे. त्यामुळे तिथला निकाल काय येतो, याचं सर्वांनाच औत्सुक्य होतं. पण आता ठाकरे गटाचा तिथला उमेदवारच पळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अशाने पुढच्या विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधात कोणता उमेदवार उभा राहणार नाही, असे जयंत पाटील यांनी म्हटले. त्यामुळे आता भाजप आणि शिंदे गट यावर काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Twitter Poll: धनुष्यबाण गोठवल्याचा फटका ठाकरेंना बसेल का? ७५ टक्के नेटिझन्सना वाटतं…

ऋतुजा लटकेंना शिंदे गटात खेचण्यासाठी मुख्यमंत्र्यांची फिल्डिंग?

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतील शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) संभाव्य उमेदवार ऋतुजा लटके यांचा गळाला लावण्यासाठी शिंदे गटाकडून जोरदार प्रयत्न सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना ‘बाळासाहेबांची शिवसेना ’ पक्षात आणून आपला पक्ष व भाजप युतीची उमेदवारी द्यावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्नशील आहेत. भाजपच्या मुरजी पटेल (Murji Patel) यांनी मतदारसंघात आपला प्रचार सुरु केला असला तरी शेवटच्या क्षणी ऋतुजा लटके शिंदे गटात येण्याची शक्यता गृहीत धरून सर्व पर्याय खुले ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे भाजपकडून अद्याप मुरजी पटेल यांनी उमेदवारी अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत १४ ऑक्टोबर रोजी संपत आहे. त्यामुळे आता शेवटच्या दोन दिवसांत काही चमत्कार घडणार का, हे पाहावे लागेल.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here