औरंगाबाद : बांधकाम क्षेत्रातील प्रसिद्ध बिल्डर आणि क्रेडाईचे कोषाध्यक्ष अनिल माधवराव अग्रहारकर (वय ५५) यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा शहरातील एक बांधकाम व्यावसायिक सावकाराच्या जाचाला कंटाळून बेपत्ता झाले आहेत. त्यांनी घर सोडण्यापूर्वी एक चिट्ठी लिहिली आहे त्यात सहा जणांची नावे असल्याचे समोर आले आहे. नंदकिशोर रामराव नांदेडकर (वय ४९) (रा.सातारा परिसर, औरंगाबाद) असे बेपत्ता व्यावसायिकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेडकर हे गेली अनेक वर्षे इलेक्ट्रिक ठेकेदार म्हणून काम करायचे. मात्र, २०१८ पासून ते बांधकाम क्षेत्रात सक्रिय झाले होते. अनेक लहान मोठे प्रकल्प त्यांनी केले. मात्र, प्रकल्पासाठी पैसा अपुरा पडत असल्याने त्यांनी खाजगी सावकाराकडून व्याजावर पैसे घेतले होते. काही दिवसापासून त्यांच्याकडे पैशाचा तगादा लावण्यात येत होता. ९ ऑक्टोबरला नांदेडकर यांनी काहीही न सांगता घर सोडले. तेव्हा ते त्यांचा मोबाईल देखील घरीच सोडून गेले.

पत्रकारपरिषदेत शेजारी बसलेला ‘तो’ नेताच ऋतुजा लटकेंचा घात करणार? मनसे नेत्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
मोबाईल चुकीने राहिला असेल म्हणून घरच्यांनी देखील लक्ष दिलं नाही. मात्र, ते रात्री घरी न आल्याने परिवार चिंतेत होता. अखेर त्यांच्या खोलीची पाहणी केली असता तेथे एक चिट्ठी घरच्यांना आढळून आली. त्या चिठ्ठीमध्ये सहा जणांची नावे आहेत, मात्र ती नावे कुणाची आहेत हे उघड होऊ शकले नाही. सुमारे १ कोटी रुपये कर्जाची परतफेड नांदेडकर यांनी सावकारांना केली होती. तरी देखील सावकाराचा त्रास देणं चालूच होतं, त्या जाचाला कंटाळून नांदेडकर यांनी घर सोडले.

सध्या या प्रकरणी गुन्हा दाखल नसून सातारा पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद घेण्यात आली आहे. पोलीस नातेवाईक, मित्र परिवार, रेल्वेस्थानक, इत्यादी ठिकाणी नांदेडकर यांचा शोध घेत आहेत.

बाजार उघडताच गुंतवणूकदारांचे नुकसान; सेन्सेक्स-निफ्टी लाल चिन्हात; IT आणि बँकिंग समभाग घसरले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here