काठमांडूः नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली हे सत्ता वाचवण्यासाठी सतत भारतावर आरोप करत आहेत. भारताने सांस्कृतिक अतिक्रमण करत नकली अयोध्य निर्माण केली. पण खरी अयोध्या ही नेपाळमध्ये आहे, असा दावा ओली यांनी केला आहे. आपल्याला सत्तेवरून हटवण्यासाठी भारत कटकारस्थान रचत असल्याचा आरोप ओली यांनी या आधी केला आहे. त्या काळात आधुनिक परिवहनाचे कुठलेही साधन आणि मोबाइल फोन नव्हता. मग राम जनकपूरपर्यंत कसे गेले? असा प्रश्न ओली यांनी उपस्थित केला आहे.

नेपाळवर सांस्कृतिक स्वरुपात अत्याचार

नेपाळचे कवी भानुभक्त आचार्य यांच्या २०६व्या जयंती निमित्त पंतप्रधान ओली यांच्या निवासस्थानी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नेपाळवर सांस्कृतिक स्वरुपातून अत्याचार केला गेला. ऐतिहासिसक तथ्यांशी छेडछाड केली गेली. यामुळे भारतीय राजकुमार राम यांना सीता दिला होती असं आम्ही आताही मानतो, असं ओली यावेळी म्हणाले.

भारतातील अयोध्या नकली

भारतातील अयोध्येच्या राजकुमाराला आम्ही सीता दिला नाही. तर नेपाळमधील अयोध्येच्या राजकुमाराला राजकुमाराला दिली. बीजरंगपासून काही अंतरावर पश्चिमेला अयोध्या नावाचं गाव आहे. भारतात बनवली गेलेली अयोध्या खरी नसून ती नकली आहे, असा दावा ओली यांनी केला.

इतके दूर राम कसे येतील?

भारतायी अयोध्या खरी आहे तर मग तिथून राजकुमार लग्नासाठी जनकपूरला कसे येऊ शकतात? विज्ञान आणि ज्ञानाची उत्पत्ती आणि विकास हा नेपाळमध्ये झाला, असं ओली म्हणाले.

ओली यांच्या राजीनाम्याची मागणी वाढली

नेपाळमध्ये अनेक दिवसांपासून के. पी. ओली यांच्या राजीनाम्याची मागणी जोरधरते आहे. ओली यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन स्थगित केल्याने आता एक अध्यादेश आणून ते पक्षाचे विभाजन करण्याच्या प्रयत्नात आहेत. ओली हे नेपाळमधील मुख्य विरोधी पक्ष नेपाळी काँग्रेसच्या संपर्कात आहेत. यामुळे त्यांना पाठिंबा मिळू शकतो, असं इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तात म्हटलंय. अध्यादेश आणून ओली हे राजकीय पक्षाच्या कायद्यात बदल करू शकतात. याने त्यांना पक्षाचे सहज विभाजन करता येईल. हे सगळं चीन आणि पाकिस्तानच्या पाठिंब्याने होतंय.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here