मुंबई : महाराष्ट्रात यंदाच्या पावसानं आता परतीचा मार्ग धरला आहे. परतीच्या पावसामुळे राज्यभरात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे. अशात आता आजपासून पाऊस ओसरण्याचे संकेत हवामान खात्याकडून देण्यात आले आहेत. यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागांमध्ये विदर्भ, मराठवाड्यासह मुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये पाऊस कोसळणार असून यामुळे शेतकऱ्यांनाही सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. अरबी समुद्रात सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर आणि अरबी समुद्रातील कोकण गोव्याच्या किनाऱ्यालगत ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. त्यामुळे राज्यात याचा परिणाम पाहायला मिळेल.

Love Affair : प्रेमात अडचण ठरणाऱ्या डॉक्टर पतीचा काढला काटा, भुलीचं इंजेक्शन दिल्याने कोमात, ३२ दिवसांनी घडलं भयंकर
गेल्या काही दिवसांमध्ये विदर्भामध्ये मराठवाड्यात कोकणात आणि मध्य महाराष्ट्रमध्ये परतीच्या पावसानं हाहाकार माजवला. यामुळे शेतीला मोठा फटका बसला. अनेक पिकांचे नुकसान झालं. अशात आता परतीचा पाऊसही चांगलाच बरसणार असल्यामुळे नागरिकांनी पावसाचा अंदाज घेत घराबाहेर पडण्याच्या सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत.

Mumbai News : मुंबईकरांनो इकडे लक्ष द्या, ठाण्याकडे जाणारा ‘हा’ मार्ग ४ दिवस बंद; वाचा पर्यायी मार्ग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here