वाचा:
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संयमी आहेत आणि त्यांनी आपल्या राजकीय वाटचालीत नेहमीच सावधपणे पावले टाकलेली आहेत. त्यामुळेच राजस्थानात राजकीय भूकंप घडलाच तर त्याचे हादरे महाराष्ट्रात बसू नयेत, म्हणून महाविकास आघाडीतील संवादाचा पूल अधिक भक्कम करण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी हाती घेतल्याचे स्पष्ट संकेत आज मिळाले आहेत.
वाचा:
राजस्थानमधील राजकारणाला दर काही तासांनी नवं वळण मिळत असताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज महाविकास आघाडीच्या दोन प्रमुख नेत्यांशी संवादाचा योग साधला. सर्वप्रथम काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात पोहचले. सायंकाळी सुमारे तासभर ही भेट झाली. ही बैठक संपल्यानंतर पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तिथे दाखल झाले. पवार यांच्याशीही मुख्यमंत्र्यांनी दीर्घ चर्चा केली. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. या बैठकांमधील चर्चेचा अधिकृत तपशील कुणीही दिला नसला तरी राजस्थानातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या बैठका महत्त्वाच्या ठरल्या.
वाचा:
महाविकास आघाडीचं सरकार चालवत असताना तिन्ही पक्षांत सुसंवाद असायला हवा, अशी अपेक्षा गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून व्यक्त होत आहे. याअनुशंगाने बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली होती. शरद पवार यांनी शिवसेनेचं मुखपत्र सामनाला दिलेल्या मुलाखतीतही यावर आपलं मत स्पष्टपणे मांडलं होतं. त्यातच राजस्थानात काँग्रेस पक्षातील गृहकलहातून जे अस्थिरतेचे ढग दाटले आहेत तशी कोणतीही वेळ महाराष्ट्रावर येऊ नये, असे तिन्ही पक्षांना वाटत आहे. त्यातूनच आजच्या भेटीगाठी घडल्याची चर्चा आहे. सरकारमध्ये महत्त्वाचे निर्णय घेताना एकवाक्यता असावी, आधी चर्चा करून मगच निर्णय घ्यावा, तिन्ही पक्षांनी समन्वय राखावा, अशा विविध मुद्द्यांवर आज चर्चा झाल्याचेही सांगण्यात येत आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times