Mahavitaran: राज्य विद्युत नियामक आयोग आणि महावितरण यांच्यात वीज दर वाढी संदर्भात एक बैठक झाली असून लवकरच राज्यातील ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक बसण्याची शक्यता आहे.

 

electricity
मुंबई: महगाईची झळ सहन करणाऱ्या सर्व सामान्य जनतेला आता वीज दर वाढीचा शॉक बसणार आहे. राज्यात दरवाढीसाठी महावितरणने गुरुवारी राज्य विद्युत नियामक आयोगाशी चर्चा केल्याचे वृत्त आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा वीज दरवाढ होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्य विद्युत नियामक आयोगाने महावितरणला वीज दरवाढी संदर्भात एक प्रस्ताव देण्यास सांगितले आहे. संबंधित प्रस्ताव दिल्यानंतर दरवाढीबाबतचा निर्णय घेतला जाईल करोना लॉकडाऊनच्या काळात महावितरणचे मोठे नुकसान झाले होते. तसेच त्या काळात थकबाकी देखील वाढली होती. ही थकबाकी अद्याप वसूल झालेली नाही. थकबाकीची रक्कम ७० हजार कोटी इतकी असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

सध्या महावितरण ग्राहकांकडून इंथन समायोजन शुक्ल वसूल कर आहे. यासाठी महागड्या वीज खरेदीचे कारण दिले जाते. आता महावितरणला थकबाकी वसूल करण्यात अपयश आल्याने त्याचा फटका ग्राहकांना बसू शकतो. ज्या ग्राहकांची थकबाकी अधिक आहे त्यात सरकारचा देखील समवेश आहे. पाणीपुरवठा आणि पथदिव्यांची थकबाकी अद्याप सरकारने दिलेली नाही ही रक्कम २४ कोटींच्या पुढे असल्याचे समजते.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here